शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांतील निवडणुका खरेच सुप्त संकेत देतात का? लोकसभा निवडणुकीचा अंदाज लावणे होते अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 08:16 IST

विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. 

सुनील चावके -नवी दिल्ली :  गेल्या २५ वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांच्या उपांत्य फेरीचा कौल लोकसभा निवडणुकीत काय घडणार, याचे फसवे संकेत देत आला आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. सोनिया गांधी यांच्या पदार्पणात १९९८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडविला होता. विजयामुळे उत्साही काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणून अवघ्या एका मताच्या फरकाने वाजपेयी सरकार पाडले. त्यानंतर सोनिया गांधींनी सरकार स्थापनेविषयी दावा केला, पण काँग्रेसचे सत्तेत परतण्याचे मनसुबे हिंदी पट्ट्यातील नेत्यांनी धुळीस मिळविले.   '

भाजपलाही तोच अनुभव२००३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्ली वगळता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसला पराभूत केले. पुढे भाजपने २००४ साली सहा महिने आधी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेस पुन्हा सत्तेत२००८ साली भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राखले, पण काँग्रेसने राजस्थान आणि दिल्लीत विजय मिळवून लढत २-२ अशी बरोबरीत राखली. पण सहा महिन्यांनंतर यूपीएने २००४ पेक्षा मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेवर बसला. 

मोदींच्या लाटेत काँग्रेसचा पराभव२०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान जिंकली आणि राष्ट्रीय राजकारणातील काँग्रेसच्या पतनाची सुरुवात केली. त्यातूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी