शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सोशल मीडियातून घाणेरड्या गोष्टी पसरवू नका, मोदींचे सव्वासौ करोड देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:34 IST

पंतप्रधान म्हणाले... खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक; हा मुद्दा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही

नवी दिल्ली : लोकांनी समाजमाध्यमांद्वारे घाणेरड्या गोष्टी पसरवू नयेत, ते सभ्य समाजाचे लक्षण नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. वाराणसीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर आजूबाजूच्या अनेक चांगल्या गोष्टी इतरांना समजण्यासाठी केला जावा. खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक आहे.

संदेश किंवा व्हिडीओ यातील माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा न करता ती इतरांना पाठविली जाते.समाजमाध्यमांचा व्यवस्थित वापर करण्याचा मुद्दा हा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही. त्याचा संबंध देशातील १२५ कोटी जनतेशी आहे. समाज माध्यमांतील संदेशांमध्ये अनेकदा अभिरुचीहीन शब्दांचा वापर केलेला असतो. महिलांविषयी अत्यंत असभ्य भाषेत लिहिलेले असते. असे संदेश व्हायरल होऊ नयेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गल्लीतले भांडणही बनते राष्ट्रीय बातमीमोदी म्हणाले की, सध्या एखाद्या गल्लीत दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडणही राष्ट्रीय स्तरावरची बातमी बनते. ती तशा पद्धतीने प्रसारित केली जाते. समाजमाध्यमांचा वापर दुसऱ्यांवर राळ उडविण्यासाठी करू नये, ही सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी.देशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, अशा पद्धतीच्या बातम्यांचा प्रसार वाढायला हवा. देशाचा चेहरामोहरा बदलत असून प्रगतीही झपाट्याने होत आहे. हे खरे चित्र दाखविणारे व्हिडीओ समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पाठवा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्