शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून घाणेरड्या गोष्टी पसरवू नका, मोदींचे सव्वासौ करोड देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:34 IST

पंतप्रधान म्हणाले... खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक; हा मुद्दा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही

नवी दिल्ली : लोकांनी समाजमाध्यमांद्वारे घाणेरड्या गोष्टी पसरवू नयेत, ते सभ्य समाजाचे लक्षण नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. वाराणसीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर आजूबाजूच्या अनेक चांगल्या गोष्टी इतरांना समजण्यासाठी केला जावा. खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक आहे.

संदेश किंवा व्हिडीओ यातील माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा न करता ती इतरांना पाठविली जाते.समाजमाध्यमांचा व्यवस्थित वापर करण्याचा मुद्दा हा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही. त्याचा संबंध देशातील १२५ कोटी जनतेशी आहे. समाज माध्यमांतील संदेशांमध्ये अनेकदा अभिरुचीहीन शब्दांचा वापर केलेला असतो. महिलांविषयी अत्यंत असभ्य भाषेत लिहिलेले असते. असे संदेश व्हायरल होऊ नयेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गल्लीतले भांडणही बनते राष्ट्रीय बातमीमोदी म्हणाले की, सध्या एखाद्या गल्लीत दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडणही राष्ट्रीय स्तरावरची बातमी बनते. ती तशा पद्धतीने प्रसारित केली जाते. समाजमाध्यमांचा वापर दुसऱ्यांवर राळ उडविण्यासाठी करू नये, ही सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी.देशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, अशा पद्धतीच्या बातम्यांचा प्रसार वाढायला हवा. देशाचा चेहरामोहरा बदलत असून प्रगतीही झपाट्याने होत आहे. हे खरे चित्र दाखविणारे व्हिडीओ समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पाठवा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्