शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:05 IST

‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : ‘‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसºयाला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिलाधर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. चपळगावकर म्हणाले, ‘‘इंग्रजीच्या प्रतिष्ठेची चुकीची कल्पना हे मातृभाषेच्या न्यूनगंडाचे प्रमुख कारण आहे. इंग्रजी शाळांमध्ये चांगली पुस्तके, सुविधा मिळतात, त्या मराठी शाळेत मिळत नाहीत, असा समज आहे. मराठीची श्रीमंती वाढवायची असेल तर अभिजात दर्जाचा आग्रह धरतानाच नवे ज्ञान निर्माण करणे, व्यवहारात मराठीचा वापर वाढणे आणि अनुदान केंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. बोलीभाषा टिकवणे, मराठी समृद्ध करणे, मुलांना वाचनाची गोडी लावणे, ही सध्याची महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत.’’ ‘‘आपल्याकडे आलिशान घरे, महागड्या वस्तू, अद्ययावत सोयीसुविधा असतात. मात्र, घरात पुस्तके, विश्वकोशाचे खंड नाहीत, याची आपल्याला लाज वाटत नाही. भाषेचा वारसा टिकवणे हे व्यापक माध्यमवर्गाचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी नमूद केले. लेखकाचे स्वातंत्र्य टिकायचे असेल तर राजकीय आणि आर्थिक महत्त्वकांक्षा बाळगणे चुकीचे आहे. यामुळे धाडसाने मते मांडणारे लेखक , विचारवंत दुर्मिळ होत आहेत. सरकार विचारवंतांना दावणीला बांधु पाहत आहे.सर्जनाची कुंडली मांडता येत नाही. समाजात चांगले घडते, तेव्हा लेखकांना चैतन्य मिळते.वाड्मयात नवनिर्मिती झाली पाहिजे.उठसूट तलवारी हातात घेतात, त्यामागे विचार नसतो. समाजातील दोन घटकांमध्ये फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप वाढला आहे.सत्ताधाºयांनी विचारवंतांची भूक बाळगली पाहिजे.सरकार केवळ समित्या नेमते, समित्यांनी वेगाने काम करावे, असे त्यांना वाटत नसते.इंटरनेट माहिती उपलब्ध असते, ज्ञान नाही. ज्ञान भारतीय भाषेमध्ये निर्माण होते.अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाड्मयला जागतिक दर्जा मिळेल.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन