शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:05 IST

‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : ‘‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसºयाला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिलाधर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. चपळगावकर म्हणाले, ‘‘इंग्रजीच्या प्रतिष्ठेची चुकीची कल्पना हे मातृभाषेच्या न्यूनगंडाचे प्रमुख कारण आहे. इंग्रजी शाळांमध्ये चांगली पुस्तके, सुविधा मिळतात, त्या मराठी शाळेत मिळत नाहीत, असा समज आहे. मराठीची श्रीमंती वाढवायची असेल तर अभिजात दर्जाचा आग्रह धरतानाच नवे ज्ञान निर्माण करणे, व्यवहारात मराठीचा वापर वाढणे आणि अनुदान केंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. बोलीभाषा टिकवणे, मराठी समृद्ध करणे, मुलांना वाचनाची गोडी लावणे, ही सध्याची महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत.’’ ‘‘आपल्याकडे आलिशान घरे, महागड्या वस्तू, अद्ययावत सोयीसुविधा असतात. मात्र, घरात पुस्तके, विश्वकोशाचे खंड नाहीत, याची आपल्याला लाज वाटत नाही. भाषेचा वारसा टिकवणे हे व्यापक माध्यमवर्गाचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी नमूद केले. लेखकाचे स्वातंत्र्य टिकायचे असेल तर राजकीय आणि आर्थिक महत्त्वकांक्षा बाळगणे चुकीचे आहे. यामुळे धाडसाने मते मांडणारे लेखक , विचारवंत दुर्मिळ होत आहेत. सरकार विचारवंतांना दावणीला बांधु पाहत आहे.सर्जनाची कुंडली मांडता येत नाही. समाजात चांगले घडते, तेव्हा लेखकांना चैतन्य मिळते.वाड्मयात नवनिर्मिती झाली पाहिजे.उठसूट तलवारी हातात घेतात, त्यामागे विचार नसतो. समाजातील दोन घटकांमध्ये फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप वाढला आहे.सत्ताधाºयांनी विचारवंतांची भूक बाळगली पाहिजे.सरकार केवळ समित्या नेमते, समित्यांनी वेगाने काम करावे, असे त्यांना वाटत नसते.इंटरनेट माहिती उपलब्ध असते, ज्ञान नाही. ज्ञान भारतीय भाषेमध्ये निर्माण होते.अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाड्मयला जागतिक दर्जा मिळेल.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन