शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
3
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
4
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
5
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
6
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
7
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
8
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
9
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
10
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
11
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
12
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
13
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
14
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
15
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
16
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
17
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
18
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
19
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
20
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:05 IST

‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : ‘‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसºयाला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिलाधर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. चपळगावकर म्हणाले, ‘‘इंग्रजीच्या प्रतिष्ठेची चुकीची कल्पना हे मातृभाषेच्या न्यूनगंडाचे प्रमुख कारण आहे. इंग्रजी शाळांमध्ये चांगली पुस्तके, सुविधा मिळतात, त्या मराठी शाळेत मिळत नाहीत, असा समज आहे. मराठीची श्रीमंती वाढवायची असेल तर अभिजात दर्जाचा आग्रह धरतानाच नवे ज्ञान निर्माण करणे, व्यवहारात मराठीचा वापर वाढणे आणि अनुदान केंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. बोलीभाषा टिकवणे, मराठी समृद्ध करणे, मुलांना वाचनाची गोडी लावणे, ही सध्याची महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत.’’ ‘‘आपल्याकडे आलिशान घरे, महागड्या वस्तू, अद्ययावत सोयीसुविधा असतात. मात्र, घरात पुस्तके, विश्वकोशाचे खंड नाहीत, याची आपल्याला लाज वाटत नाही. भाषेचा वारसा टिकवणे हे व्यापक माध्यमवर्गाचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी नमूद केले. लेखकाचे स्वातंत्र्य टिकायचे असेल तर राजकीय आणि आर्थिक महत्त्वकांक्षा बाळगणे चुकीचे आहे. यामुळे धाडसाने मते मांडणारे लेखक , विचारवंत दुर्मिळ होत आहेत. सरकार विचारवंतांना दावणीला बांधु पाहत आहे.सर्जनाची कुंडली मांडता येत नाही. समाजात चांगले घडते, तेव्हा लेखकांना चैतन्य मिळते.वाड्मयात नवनिर्मिती झाली पाहिजे.उठसूट तलवारी हातात घेतात, त्यामागे विचार नसतो. समाजातील दोन घटकांमध्ये फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप वाढला आहे.सत्ताधाºयांनी विचारवंतांची भूक बाळगली पाहिजे.सरकार केवळ समित्या नेमते, समित्यांनी वेगाने काम करावे, असे त्यांना वाटत नसते.इंटरनेट माहिती उपलब्ध असते, ज्ञान नाही. ज्ञान भारतीय भाषेमध्ये निर्माण होते.अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाड्मयला जागतिक दर्जा मिळेल.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन