सर्व अतिरेकी एका ‘विशिष्ट’ समाजातील का?
By Admin | Updated: May 15, 2014 04:21 IST2014-05-15T03:10:03+5:302014-05-15T04:21:56+5:30
नरेंद्र मोदींना मतदान न करणार्यांना भारतात जागा नाही, असे बोलून वादंग निर्माण करणारे भाजपा नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.

सर्व अतिरेकी एका ‘विशिष्ट’ समाजातील का?
पाटणा/नवी दिल्ली : नरेंद्र मोदींना मतदान न करणार्यांना भारतात जागा नाही, असे बोलून वादंग निर्माण करणारे भाजपा नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. सर्व दहशतवादी एका ‘विशिष्ट’ समाजातील कसे? आणि स्वत:ला निधर्मी म्हणवणारे यावर शांत कसे?, असे बरळून त्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. ‘त्या’ समुदायातील सर्वच लोक दहशतवादी, असे मला म्हणायचे नाही़ पण ज्यांना अटक केली ते सर्वच एकाच समाजातील आहेत़ दहशतवाद हा देशाशी निगडित मुद्दा आहे, विशिष्ट समुदायाशी नाही़ असे असतानाही स्वत:ला निधर्मी म्हणवून घेणारे यावर गप्प का? हे मतांच्या राजकारणासाठीची ‘फसवी धर्मनिरपेक्षता’ आहे, असे गिरिराज म्हणाले़ भाजपाच्या तिकिटावर नवादा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले गिरिराजसिंह यांच्याविरुद्ध यापूर्वीही प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ मोदींना मतदान करणार्यांना भारतात जागा नाही़ अशांनी पाकिस्तानात जावे, असे वादग्रस्त वक्तव्य निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केले होते़ तीव्र पडसाद गिरिराजसिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह विविध पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दहशतवाद कुठल्याही एका धर्माशी निगडित नाही़ बंदुकांच्या जोरावरील दहशतवाद जितका निंदनीय आहे, तितकाच विचारांचा दहशतवादही निंदनीय आहे़, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली़