शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

“लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार NDAसोबत असतील याची काय गॅरंटी?”; डीएमके नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:33 IST

Bihar Politics: नितीश कुमार यांचा एनडीए प्रवेश इंडिया आघाडीसाठी धक्का नाही, असे डीएमके नेत्यांनी म्हटले आहे.

Bihar Politics: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, विरोधक तसेच इंडिया आघाडीतील अनेक नेते नितीश कुमार आणि भाजपवर टीका करत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार एनडीएसोबत असतील याची गॅरंटी काय, अशी विचारणा डीएमके नेत्यांनी केली आहे. 

डीएमके नेते आरएस भारती यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर थेट शब्दांत भाष्य केले आहे. थोडी अजून वाट पाहा, असेही ते म्हणाले. डीएमके खासदार टीआर बालू यांनीही बिहारमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार यांचा एनडीएमध्ये समावेश होणे हा विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का आहे, मात्र इंडिया आघाडीचे नेते यांनी ही बाब फेटाळली आहे. 

नितीश यांचा एनडीए प्रवेश इंडिया आघाडीसाठी धक्का नाही

टीआर बालू म्हणाले की, नितीश कुमार यांचे एनडीएसोबत जाणे विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी धक्कादायक नाही. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, विरोधकांच्या आघाडीत काही कामे होत नव्हती. मात्र, नितीश कुमार यांनी कोणतीही योजना समोर आणली नाही. आपण सर्वांनी हिंदीत बोलले पाहिजे, असे ते म्हणत होते. आम्ही त्यावरही काही बोललो नाही. सर्वच पक्षांना जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे, पण ही आघाडी आहे आणि जागावाटपावर चर्चा होत असते. तामिळनाडूमध्ये द्रमुकने २० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. काँग्रेस आणि द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली असून दुसऱ्या टप्प्यात ९ फेब्रुवारीनंतर चर्चा होईल, अशी माहिती टीआर बालू यांनी दिली.

दरम्यान, नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडींबाबत जाेरदार चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दोन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसोबत जाण्यामागे बोलली जात आहेत.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी