शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Diwali 2021: भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांनी दिवाळीला मुद्दाम फटाके फोडले, आपचे नेते गोपाल राय यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:51 IST

Pollution In Delhi: दिल्लीचे पर्यावरणमंत्री Gopal Rai यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे BJPचा हात आहे.

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान, लोकांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजीही केली जात आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला कडबा जाळण्यात आल्याच्या सुमारे साडेतीन हजार घटना घडल्या. त्याचाही परिणाम दिल्लीमध्ये दिसला आणि हवेची गुणवत्ता बिघडली.

त्याशिवाय गोपाल राय यांनी सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी, फटाके जाळल्यामुळे काही होत नाही. हा धर्म आणि सणांचा विषय आहे. आता सर्व शास्त्रज्ञ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे सांगत आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण होते. दोन दिवसांपूर्वी हवेची जी गुणवत्ता होती, ती आज नाही आहे.

दिवाळीमध्ये रात्री फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये हवा प्रदूषण शिखरावर होते. तसेच शनिवारीही हवाप्रदूषण धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी पूसा, मंदिर मार्ग, मेजर ध्यानचंद स्टेडियम, श्नीनिवासपुरी, आनंद विवाह, कर्णी सिंह शूटिंग रेंज आणि ओखलासह सर्वच परिसरात एक्यूआय ९९९ नोंद झाली.

दरम्यान, दिवाळीपूर्वी एक दिवस आधी गोपाल राय यांनी विरोधी पक्षांना फटाके फोडणे हे धर्माशी जोडू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021pollutionप्रदूषणAAPआपBJPभाजपा