शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Diwali 2021: भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांनी दिवाळीला मुद्दाम फटाके फोडले, आपचे नेते गोपाल राय यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:51 IST

Pollution In Delhi: दिल्लीचे पर्यावरणमंत्री Gopal Rai यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे BJPचा हात आहे.

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान, लोकांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजीही केली जात आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला कडबा जाळण्यात आल्याच्या सुमारे साडेतीन हजार घटना घडल्या. त्याचाही परिणाम दिल्लीमध्ये दिसला आणि हवेची गुणवत्ता बिघडली.

त्याशिवाय गोपाल राय यांनी सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी, फटाके जाळल्यामुळे काही होत नाही. हा धर्म आणि सणांचा विषय आहे. आता सर्व शास्त्रज्ञ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे सांगत आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण होते. दोन दिवसांपूर्वी हवेची जी गुणवत्ता होती, ती आज नाही आहे.

दिवाळीमध्ये रात्री फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये हवा प्रदूषण शिखरावर होते. तसेच शनिवारीही हवाप्रदूषण धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी पूसा, मंदिर मार्ग, मेजर ध्यानचंद स्टेडियम, श्नीनिवासपुरी, आनंद विवाह, कर्णी सिंह शूटिंग रेंज आणि ओखलासह सर्वच परिसरात एक्यूआय ९९९ नोंद झाली.

दरम्यान, दिवाळीपूर्वी एक दिवस आधी गोपाल राय यांनी विरोधी पक्षांना फटाके फोडणे हे धर्माशी जोडू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021pollutionप्रदूषणAAPआपBJPभाजपा