शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

Diwali 2021: भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांनी दिवाळीला मुद्दाम फटाके फोडले, आपचे नेते गोपाल राय यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:51 IST

Pollution In Delhi: दिल्लीचे पर्यावरणमंत्री Gopal Rai यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे BJPचा हात आहे.

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान, लोकांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजीही केली जात आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला कडबा जाळण्यात आल्याच्या सुमारे साडेतीन हजार घटना घडल्या. त्याचाही परिणाम दिल्लीमध्ये दिसला आणि हवेची गुणवत्ता बिघडली.

त्याशिवाय गोपाल राय यांनी सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी, फटाके जाळल्यामुळे काही होत नाही. हा धर्म आणि सणांचा विषय आहे. आता सर्व शास्त्रज्ञ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे सांगत आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण होते. दोन दिवसांपूर्वी हवेची जी गुणवत्ता होती, ती आज नाही आहे.

दिवाळीमध्ये रात्री फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये हवा प्रदूषण शिखरावर होते. तसेच शनिवारीही हवाप्रदूषण धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी पूसा, मंदिर मार्ग, मेजर ध्यानचंद स्टेडियम, श्नीनिवासपुरी, आनंद विवाह, कर्णी सिंह शूटिंग रेंज आणि ओखलासह सर्वच परिसरात एक्यूआय ९९९ नोंद झाली.

दरम्यान, दिवाळीपूर्वी एक दिवस आधी गोपाल राय यांनी विरोधी पक्षांना फटाके फोडणे हे धर्माशी जोडू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021pollutionप्रदूषणAAPआपBJPभाजपा