शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:45 IST

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजस्थानमध्येकाँग्रेस पक्षाला संकटाचा सामना करावा लागत असतानाच राज्य भाजपामधील असंतोषही समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याशी संबंधित समस्येवर भाजपा नेतृत्वही झगडत आहे. 

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाल्यापासून त्या अधिक सक्रिय नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांना जानेवारी २०१९मध्ये विरोधी पक्षनेते आणि सतीश पुनिया यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०२०मध्ये सचिन पायलट यांनी २०हून अधिक आमदारांसह आपली ताकद दाखविली. या ऑपरेशन लोटसमध्येही वसुंधरा राजे यांचा सहभाग नव्हता. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे वसुंधरा राजे यांची नव्हे तर, भाजप नेतृत्त्वाची निवड आहेत, हेही नंतर दिसून आले. 

भाजपाच्या चुकीच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आणि काँग्रेसचे काही आमदार सचिन पायलट यांच्या नियंत्रणातून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीला १५ महिने बाकी असताना भाजपा नेतृत्व आता स्वत:चे घर व्यवस्थित ठेवत आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे ७१ आमदार आहेत आणि २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपा सर्व गटांना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. 

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ?  अलिकडच्या काळात भाजपा नेतृत्व वसुंधरा राजे यांना महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरीही त्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय राहिल्या आहेत.भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाऊ शकते. दुष्यंत सिंह हे चार वेळा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा