शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:45 IST

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजस्थानमध्येकाँग्रेस पक्षाला संकटाचा सामना करावा लागत असतानाच राज्य भाजपामधील असंतोषही समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याशी संबंधित समस्येवर भाजपा नेतृत्वही झगडत आहे. 

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाल्यापासून त्या अधिक सक्रिय नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांना जानेवारी २०१९मध्ये विरोधी पक्षनेते आणि सतीश पुनिया यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०२०मध्ये सचिन पायलट यांनी २०हून अधिक आमदारांसह आपली ताकद दाखविली. या ऑपरेशन लोटसमध्येही वसुंधरा राजे यांचा सहभाग नव्हता. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे वसुंधरा राजे यांची नव्हे तर, भाजप नेतृत्त्वाची निवड आहेत, हेही नंतर दिसून आले. 

भाजपाच्या चुकीच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आणि काँग्रेसचे काही आमदार सचिन पायलट यांच्या नियंत्रणातून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीला १५ महिने बाकी असताना भाजपा नेतृत्व आता स्वत:चे घर व्यवस्थित ठेवत आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे ७१ आमदार आहेत आणि २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपा सर्व गटांना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. 

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ?  अलिकडच्या काळात भाजपा नेतृत्व वसुंधरा राजे यांना महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरीही त्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय राहिल्या आहेत.भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाऊ शकते. दुष्यंत सिंह हे चार वेळा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा