शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अपात्रतेचा मुद्दा; आम आदमी पार्टी नव्याने करणार याचिका, पहिली याचिका घेतली मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:39 IST

निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे. लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झालेली आहे. तथापि, या आमदारांनी सोमवारी स्पष्ट केले की, अपात्र ठरविण्याच्या अधिसूचनेवर विचार विमर्श केल्यानंतर, ते न्यायालयात नव्याने अर्ज दाखल करणार आहेत.न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी या आमदारांना आपला अर्ज परत घेण्याची परवानगी दिली आहे. आपकडून हजर असलेले एक वकील मनीष वशिष्ट यांनी न्यायालयात सांगितले की, निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशींना आव्हान देणारीयाचिका आता अर्थहीन आहे.कारण याबाबतची अधिसूचना २० जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे.यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी -आपच्या आमदारांना अपात्र ठरविण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय म्हणजे तुघलकशाही असल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांनी केली आहे. यशवंत सिन्हा यांनी टिष्ट्वट केले आहे की, राष्ट्रपतींचा निर्णय हा न्यायाच्या विरुद्ध आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनीटिष्ट्वट केले की, आपच्या विरोधातील हे सूडाचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही.निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारनेच हे घडवून आणले. आमदारांनी बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नाही. भाजपाने आगामी २ वर्षांसाठी दिल्लीतील विकास कामे रोखली आहेत. मात्र, लोक याला चांगले प्रत्युत्तर देतील- मनीष सिसोदिया,उपमुख्यमंत्री, दिल्ली.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा