शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:34 IST

भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या २ घटक पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अलीकडेच जेडीपीचे नितीश कुमार यांच्याविरोधात विधान केले होते. बिहारमधील कायदा सुव्यवस्थेवर टीकास्त्र करत चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. पासवान यांच्या विधानावर भाजपा श्रेष्ठी नाराज आहेत. 

सूत्रांनुसार, भाजपा लवकरच चिराग पासवान यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेणार आहे. त्यात आघाडीची एकजूट ठेवणे आणि निवडणुकीपूर्वी नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश दिले जातील. बिहारमध्ये एनडीएचा चेहरा नितीश कुमारच असतील आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल असं भाजपाने स्पष्ट केले आहे. चिराग पासवान यांच्या विधानांमुळे महाआघाडीविरोधात एनडीएच्या एकीला धक्का पोहचण्याची भाजपाला चिंता सतावत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच बिहारमधील रॅलीत मजबूत एनडीएचा संदेश दिला आहे. त्यात चिराग पासवान यांच्या टीकेमुळे नुकसान होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चिराग पासवान अशी विधाने करत आहेत. परंतु त्यामुळे एनडीएबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. एलजेपी, जेडीयू आणि भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहेत असं भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. बिहारमध्ये एनडीएविरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे आघाडी मजबूत आणि एकच आवाज हा रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे असं सांगितले जाते. 

२४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग

दरम्यान, एनडीएने २४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग केले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. परंतु तिकिट वाटपामुळे काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चिराग पासवान हे दुधारी तलवार असल्याचं बोलले जाते. नितीश कुमार यांच्यावर टीका करून ते पासवान मते एकत्र ठेवू इच्छितात तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. रामविलास पासवान यांच्या काळातही एलजेपी आणि जेडीयू यांचे फार सौख्य राहिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागत आहे.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानElectionनिवडणूक 2024National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी