शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:34 IST

भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या २ घटक पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अलीकडेच जेडीपीचे नितीश कुमार यांच्याविरोधात विधान केले होते. बिहारमधील कायदा सुव्यवस्थेवर टीकास्त्र करत चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. पासवान यांच्या विधानावर भाजपा श्रेष्ठी नाराज आहेत. 

सूत्रांनुसार, भाजपा लवकरच चिराग पासवान यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेणार आहे. त्यात आघाडीची एकजूट ठेवणे आणि निवडणुकीपूर्वी नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश दिले जातील. बिहारमध्ये एनडीएचा चेहरा नितीश कुमारच असतील आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल असं भाजपाने स्पष्ट केले आहे. चिराग पासवान यांच्या विधानांमुळे महाआघाडीविरोधात एनडीएच्या एकीला धक्का पोहचण्याची भाजपाला चिंता सतावत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच बिहारमधील रॅलीत मजबूत एनडीएचा संदेश दिला आहे. त्यात चिराग पासवान यांच्या टीकेमुळे नुकसान होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चिराग पासवान अशी विधाने करत आहेत. परंतु त्यामुळे एनडीएबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. एलजेपी, जेडीयू आणि भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहेत असं भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. बिहारमध्ये एनडीएविरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे आघाडी मजबूत आणि एकच आवाज हा रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे असं सांगितले जाते. 

२४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग

दरम्यान, एनडीएने २४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग केले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. परंतु तिकिट वाटपामुळे काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चिराग पासवान हे दुधारी तलवार असल्याचं बोलले जाते. नितीश कुमार यांच्यावर टीका करून ते पासवान मते एकत्र ठेवू इच्छितात तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. रामविलास पासवान यांच्या काळातही एलजेपी आणि जेडीयू यांचे फार सौख्य राहिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागत आहे.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानElectionनिवडणूक 2024National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी