शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:34 IST

भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या २ घटक पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अलीकडेच जेडीपीचे नितीश कुमार यांच्याविरोधात विधान केले होते. बिहारमधील कायदा सुव्यवस्थेवर टीकास्त्र करत चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. पासवान यांच्या विधानावर भाजपा श्रेष्ठी नाराज आहेत. 

सूत्रांनुसार, भाजपा लवकरच चिराग पासवान यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेणार आहे. त्यात आघाडीची एकजूट ठेवणे आणि निवडणुकीपूर्वी नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश दिले जातील. बिहारमध्ये एनडीएचा चेहरा नितीश कुमारच असतील आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल असं भाजपाने स्पष्ट केले आहे. चिराग पासवान यांच्या विधानांमुळे महाआघाडीविरोधात एनडीएच्या एकीला धक्का पोहचण्याची भाजपाला चिंता सतावत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच बिहारमधील रॅलीत मजबूत एनडीएचा संदेश दिला आहे. त्यात चिराग पासवान यांच्या टीकेमुळे नुकसान होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चिराग पासवान अशी विधाने करत आहेत. परंतु त्यामुळे एनडीएबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. एलजेपी, जेडीयू आणि भाजपा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहेत असं भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. बिहारमध्ये एनडीएविरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे आघाडी मजबूत आणि एकच आवाज हा रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे असं सांगितले जाते. 

२४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग

दरम्यान, एनडीएने २४३ जागांवर लढण्याचं प्लॅनिंग केले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित झाल्यावर जाहीर केले जाईल. परंतु तिकिट वाटपामुळे काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चिराग पासवान हे दुधारी तलवार असल्याचं बोलले जाते. नितीश कुमार यांच्यावर टीका करून ते पासवान मते एकत्र ठेवू इच्छितात तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. रामविलास पासवान यांच्या काळातही एलजेपी आणि जेडीयू यांचे फार सौख्य राहिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागत आहे.  

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानElectionनिवडणूक 2024National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी