शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:18 IST

काँग्रेसची जोरदार निदर्शने; राज्यभर ठिकठिकाणी पडसाद, विविध संघटनांकडून निषेध

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. प्रदेश काँग्रेसने मुंबईत निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यात अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर निदर्शने के ली. छोट्या छोट्या गोष्टीत सतत टिवटिव करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशच्या या घटनेवर मौन का बाळगले आहे? महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना ही दुर्दैवी घटना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध का केला नाही? अस सवालही काँग्रेस नेत्यांनी केला.पोलीस दल जातीत विभागलेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागासवर्गीय मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पोलिसच त्यांना जाळून टाकत आहेत. पोलीस दल जातीमध्ये विभागले गेले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार तातडीने बरखास्त करावे.या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे. हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला दिलेली ही वागणूक निंदनीय आहे.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसउत्तर प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप मागणी करते. आता भाजपने आत्मचिंतन करावे, आणि राष्ट्रपती राजवटीची गरज उत्तर प्रदेशात जास्त आहे हे तपासून पाहावे.- खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसदलित, पीडित, शोषितसमाजातील मुलीवर अन्याय होतो. तिचा आक्रोश देशात पोहोचू नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दडपशाही केली आहे. एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे महत्त्वाचेआहे. ती सेलिब्रिटी नव्हती म्हणूनतिला न्याय नाकारण्याचा अधिकार रामाच्या नावाने राज्य करणाऱ्यांनानाही.- खा. संजय राऊत, खासदार शिवसेनाउत्तर प्रदेशातीलहाथरस येथील अत्याचाराची घटना पाशवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. एरवी महाराष्टÑात थोडं कुठं काय झालं की आरडाओरडकरणारे, जाब विचारणारेआत्ता गप्प का आहेत?- राज ठाकरे, मनसे प्रमुख

टॅग्स :congressकाँग्रेसRapeबलात्कारPoliceपोलिस