शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:18 IST

काँग्रेसची जोरदार निदर्शने; राज्यभर ठिकठिकाणी पडसाद, विविध संघटनांकडून निषेध

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. प्रदेश काँग्रेसने मुंबईत निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यात अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर निदर्शने के ली. छोट्या छोट्या गोष्टीत सतत टिवटिव करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशच्या या घटनेवर मौन का बाळगले आहे? महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना ही दुर्दैवी घटना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध का केला नाही? अस सवालही काँग्रेस नेत्यांनी केला.पोलीस दल जातीत विभागलेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागासवर्गीय मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पोलिसच त्यांना जाळून टाकत आहेत. पोलीस दल जातीमध्ये विभागले गेले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार तातडीने बरखास्त करावे.या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे. हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला दिलेली ही वागणूक निंदनीय आहे.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसउत्तर प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप मागणी करते. आता भाजपने आत्मचिंतन करावे, आणि राष्ट्रपती राजवटीची गरज उत्तर प्रदेशात जास्त आहे हे तपासून पाहावे.- खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसदलित, पीडित, शोषितसमाजातील मुलीवर अन्याय होतो. तिचा आक्रोश देशात पोहोचू नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दडपशाही केली आहे. एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे महत्त्वाचेआहे. ती सेलिब्रिटी नव्हती म्हणूनतिला न्याय नाकारण्याचा अधिकार रामाच्या नावाने राज्य करणाऱ्यांनानाही.- खा. संजय राऊत, खासदार शिवसेनाउत्तर प्रदेशातीलहाथरस येथील अत्याचाराची घटना पाशवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. एरवी महाराष्टÑात थोडं कुठं काय झालं की आरडाओरडकरणारे, जाब विचारणारेआत्ता गप्प का आहेत?- राज ठाकरे, मनसे प्रमुख

टॅग्स :congressकाँग्रेसRapeबलात्कारPoliceपोलिस