शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:43 IST

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : एनडीए सरकारविरोधात काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मांडलेल्या ठरावावर गुरुवार, ३ ऑगस्टपासून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडे अविश्वास प्रस्तावाला पराभूत करण्यासाठी ३५१चे संख्याबळ आहे. 

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे. गौरव गोगोई यांच्या प्रस्तावावर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ३ ऑगस्ट रोजी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस चालणाऱ्या या चर्चेला शुक्रवारी ४ ऑगस्टला उत्तर देऊ शकतात.  

या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत उपस्थित नसण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभेत केंद्र सरकारकडे असलेल्या मोठ्या बहुमतामुळे अविश्वास ठराव निष्फळ ठरेल, हे निश्चित आहे. मात्र, या प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधी पक्षांना सरकारविरोधात संताप व्यक्त करण्याची पुरेपूर संधी मिळणार आहे. काँग्रेससह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही या काळात राहुल गांधी यांची उणीव भासेल. मागच्या वेळी त्यांच्या भाषणानंतर राहुल गांधी हे त्यांच्या जागेवरून उठले आणि पंतप्रधान मोदी बसतात त्या ठिकाणी आले व त्यांना भेटले. याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. केंद्र सरकार आपल्या संख्याबळाच्या संदर्भात विरोधकांना आश्चर्यचकित करण्याच्या मन:स्थितीत आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकारला इंडिया आघाडीतील काही संसद सदस्यांची मते मिळू शकतात. यात नितीशकुमार यांच्या जेडीयूमधील काही खासदार सरकारच्या संपर्कात आहेत. 

...हा डाव विरोधकांना महागात पडेल -  अविश्वास प्रस्तावाचा हा डाव विरोधकांना चांगलाच महागात पडणार आहे. मणिपूरसोबतच पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगडमधील महिलांसोबत झालेल्या अमानुष घटनांवरही चर्चा होणार आहे. -  मोदींसाठी २०२४चा अजेंडा निश्चित करण्याची ही एक उत्तम संधी असेल. लोकसभेत भाजपचे संख्याबळ ३०१ आहे. त्यामुळे अध्यक्षांना भाजपला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. त्यामुळे विरोधी पक्षांना जास्त ऐकून घ्यावे लागेल,

नियमानुसार सत्ताधारी पक्षाला आधी बहुमत सिद्ध करणे बंधनकारक नाही. सर्वांना माहीत आहे की लोकसभेत सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत आहे आणि संख्याबळ आमच्या बाजूने आहे.-पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री,  राज्यसभेतील सभागृह नेते

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस