शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यसभेतील चर्चा; ध्येय काँग्रेस मुक्तीचे, भाषण मात्र काँग्रेसयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:06 IST

नववर्षात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यात सरकारने गेल्या वर्षात केलेल्या व पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या धोरणाचा मसुदा सादर केला जातो. राष्ट्रपतींचे भाषण प्रामुख्याने  सरकारची भूमिका असते.

सुरेश भुसारी - 

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संसदेतील अभिभाषणावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने काँग्रेसला लक्ष्य करण्याचा शिरस्ता मंगळवारीही राज्यसभेत कायम राखला.नववर्षात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यात सरकारने गेल्या वर्षात केलेल्या व पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या धोरणाचा मसुदा सादर केला जातो. राष्ट्रपतींचे भाषण प्रामुख्याने  सरकारची भूमिका असते. राष्ट्रपतींनी मांडलेल्या मुद्यांना केंद्रातील सरकार कसे पुढे नेणार आहे, याची ब्ल्यू प्रिंट ते देतील, अशी अपेक्षा असते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सत्ताधारी व विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. विरोधकांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. या अभिभाषणाच्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतात व विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देतील, असा कयास असताना पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही दिवस सरकारच्या कामगिरीचा फारसा उल्लेख न करता काँग्रेसवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून मजुरांना बिहार व उत्तर प्रदेशमध्ये गावाला जाण्यासाठी काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या हेतूंवर थेट संशय घेतला. याउलट मोदी सरकारनेच मजुरांना गावाला जाण्यासाठी मुंबईसह विविध महानगरांतून श्रमिक एक्स्प्रेस सुरू केल्या होत्या, याचा पंतप्रधानांना बोलण्याच्या ओघात विसर पडल्याचे स्पष्ट झाले. तीव्र प्रतिक्रिया लोकसभेत केलेल्या भाषणावर महाविकास आघाडी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मंगळवारी राज्यसभेतील भाषणांमध्ये या मुद्याचा उल्लेख केला नाही; परंतु देश काँग्रेसमुक्त करण्याची वारंवार भलावण करणाऱ्या पंतप्रधानांचे भाषण दोन्ही दिवस काँग्रेसमुक्त राहू शकले नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस