शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

‘आपदा’ आता सहन करणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:41 IST

दिल्लीसाठी ‘नमो भारत रेल्वे’सह विकास प्रकल्पांची दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नववर्षातील रविवार दिल्लीकरांसाठी लाभदायी ठरला. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमो भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. शिवाय, १२,२०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच कोनशिलांचे अनावरण मोदी यांनी केले. यानंतर रोहिणीमध्ये जपानी पार्कमध्ये आयोजित परिवर्तन सभेत मार्गदर्शनही केले. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टीका करताना ‘आता ‘आपदा’ सहन करणार नाही, परिवर्तन घडवू’, अशी घोषणा मोदी यांनी केली. दिल्लीतील नमो भारत रेल्वेचा हा १३ किमी अंतराचा टप्पा पूर्ण झाला आहे. यावेळी मोदी यांनी साहिबाबाद ते न्यू अशोकनगरपर्यंत नमो भारत रेल्वेतून प्रवास केला.

पंतप्रधान म्हणाले...

  • ‘आपदा’वाल्यांनी दिल्लीची १० वर्षे वाया घालवली. ज्यांना दिल्लीची काळजी नाही ते विकास करू शकत नाहीत. 
  • सुशासन राबवणारा पक्ष म्हणून दिल्लीचा भाजपवरच विश्वास आहे. 
  • २१ व्या शतकातील एक चतुर्थांश वर्षे सरली आहेत. आता आगामी २५ वर्षे दिल्लीच्या, भारताच्या भवितव्यासाठी महत्त्वाची.
  • भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महाशक्ती ठरेल तेव्हा विकसित भारताचा तो मोलाचा टप्पा ठरेल. 

योजना सुरूच राहतील

भाजप सत्तेत आला तर दिल्लीत सध्या सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजना सुरूच राहतील, अशी हमी देत फक्त या योजनांच्या अंमलबजावणीतील लोक काढून तेथे प्रामाणिक लोकांची भरती केली जाईल, अशी हमी मोदी यांनी दिली.

सरकारच्या सहकार्याचे यश : केजरीवाल

पंतप्रधान मोदी यांनी ज्या योजना आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले ते प्रकल्प दिल्लीतील ‘आप’ सरकार व केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ‘आप’च्या नेत्यांना तुरुंगात टाकले, अपमान केला तरीही आम्ही केवळ विकास आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान