शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

शेतक-यांना थेट अनुदान द्या!

By admin | Updated: March 14, 2015 01:59 IST

शेतक-यांना थेट अनुदान (सबसिडी) द्या. सोबतच खतांना नियंत्रणमुक्त करा, अशी शिफारस खाद्यान्न विभागाच्या उच्चस्तरीय समितीने केली असल्याचे सरकारने शुक्रवारी सांगितले.

नवी दिल्ली : शेतक-यांना थेट अनुदान (सबसिडी) द्या. सोबतच खतांना नियंत्रणमुक्त करा, अशी शिफारस खाद्यान्न विभागाच्या उच्चस्तरीय समितीने केली असल्याचे सरकारने शुक्रवारी सांगितले.राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल रसायन आणि खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली. खासदार शांता कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना थेट अनुदान द्या तसेच खत क्षेत्र नियंत्रणमुक्त करण्याची शिफारस या समितीने केली आहे. यामुळे बिगरकृषी प्रयोगांसोबत शेजारी देशांना होणाऱ्या युरिया विक्रीवर अंकुश आणण्यास मदत मिळेल. ही शिफारस विचाराधीन आहे, असे अहीर यांनी सांगितले. उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनुसार खतांवरील अनुदान संपुष्टात आणण्याचा सरकारचा विचार आहे का? सबसिडीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार का? असे असेल तर संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदी काय असेल आणि विदर्भातील किती शेतकऱ्यांना यात सामील केले जाण्याची शक्यता आहे, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता.रेल्वेतील आधुनिकीकरण एक निरंतर प्रक्रियारेल्वेत अत्याधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया असल्याचे रेल्वेराज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल त्यांनी ही माहिती दिली. रेल्वे जाळे अत्याधुनिक बनविण्याच्या प्रक्रियेंतर्गत नूतनीकरण करतेवेळी प्रतिकिमी १६६० स्लीपरच्या प्री स्ट्रेस्ड रिइन्फोर्ड कॉन्क्रिट स्लीपरवर ६० कि.ग्रॅ./९० अल्टिमेट टेन्साईल स्ट्रैंथ रुळाचा आधुनिक रेल्वेमार्ग तयार करणे, लांब पल्ल्याचे रेल्वेमार्ग तयार करणे, एल्मिनो थर्मिक वेल्डिंगचा वापर कमी करणे आणि रेल्वेमार्गांसाठी उत्तम वेल्डिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अर्थात फ्लॅश बट वेल्डिंग ट्रॅक यंत्राच्या मदतीने रेल्वेमार्गाची देखभाल, दोष शोधण्यासाठी रेल्वेमार्गांच्या तपासणीचे काम सुरूआहे.आधुनिक रेल्वेमार्गांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यात सुधारणा करणे, पूल मजबूत करणे तसेच दळणवळण प्रणाली आधुनिकीकरणासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता. रेल्वेतील थेट विदेशी गुंतवणुकीवर सरकारचे काय धोरण आहे, अशी विचारणाही त्यांनी केली होती. रेल्वेराज्यमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी एक निरंतर प्रक्रिया आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उपनगरीय कॉरिडोर, हायस्पीड ट्रेन योजना, रेल्वेविद्युतीकरण, परिचालन आणि देखभाली यात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीची परवानगी दिली आहे. रेल्वेत गुंतवणुकीसंदर्भात अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.