शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

''50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार; पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 9:39 AM

50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

ठळक मुद्दे50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणारगरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे.

नवी दिल्लीः  50 लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार असून, पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. गरज पडल्यास त्यांना देशाबाहेरही हाकलून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 24 परगना जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सर्वात आधी त्यांचं नाव मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ममतादीदींना मतांचं ध्रुवीकरण करता येणार नाही. एकदा असं झाल्यास ममतादीदींची मतं आपोआपच कमी होतील आणि येत्या निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकू, असा विश्वास घोष यांनी व्यक्त केला आहे. ममतादीदींच्या पक्षाला 50 जागासुद्धा जिंकता येणार नाहीत.तत्पूर्वी घोष यांनी 12 जानेवारीलासुद्धा असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांना भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात गोळ्या घातल्या पाहिजेत. राज्यात एक कोटी घुसखोर आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हिंसक प्रदर्शन करत 500 ते 600 कोटी रुपयांचं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. ती काय त्यांच्या वडिलांची संपत्ती आहे काय?, ते सरकारच्या संपत्तीला कशा प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. जी करदात्यांच्या पैशातून तयार झाली आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटक सरकारनं अशा राष्ट्रविरोधी तत्त्वांवर गोळीबार करून चालवून योग्य काम केलं आहे. आमचंच खातात, इथेच राहतात आणि इथल्याच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. त्यांच्या या विधानापासून भाजपानं हात झटकले होते. दिलीप घोष जे काही बोलले आहेत, त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांचे विचार आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल