शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:49 IST

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा गड असलेल्या भोपाळचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. १९८९ पासून या मतदार संघात भाजपचा एकदाही पराभव झालेला नाही. या मतदार संघातून दिग्विजय यांना माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आव्हान देण्याची शक्यता आहे. परंतु दिग्विजय सिंह यांनी एक पाउल पुढे टाकत, भोपाळमधून आपल्याविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: येऊन माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी. कोणीही असो, शिवराज किंवा प्रज्ञा ठाकून मी तयार आहे. प्रत्येक निवडणूक कठिणच असते, कोणत्याही निवडणुकीला सोपं समजू नये. मी पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगत दिग्विजय सिंह यांना आपल्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी भोपाळला यावे अशी इच्छा व्यक्त केली.

सर्व जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास

दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.

दरम्यान दिग्विजय सिंह यांची निवडणूक लढविण्यासाठी पहिली पसंती राजगड मतदार संघाला होती. परंतु, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी भोपाळमधून लढविण्यास होकार दिला. या जागेवर तीन दशकापासून भाजपचे वर्चस्व आहे. सध्या अशोक झांवर या मतदार संघातून खासदार आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये २७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात सत्तांतर झाले असून काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान