शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:49 IST

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीत भाजपचा गड असलेल्या भोपाळचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. १९८९ पासून या मतदार संघात भाजपचा एकदाही पराभव झालेला नाही. या मतदार संघातून दिग्विजय यांना माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आव्हान देण्याची शक्यता आहे. परंतु दिग्विजय सिंह यांनी एक पाउल पुढे टाकत, भोपाळमधून आपल्याविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: येऊन माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी. कोणीही असो, शिवराज किंवा प्रज्ञा ठाकून मी तयार आहे. प्रत्येक निवडणूक कठिणच असते, कोणत्याही निवडणुकीला सोपं समजू नये. मी पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगत दिग्विजय सिंह यांना आपल्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी भोपाळला यावे अशी इच्छा व्यक्त केली.

सर्व जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास

दिग्विजय सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, भाजप मध्य प्रदेशातील २९ पैकी सर्वच्या सर्व २९ जागा जिंकेल. राज्यात भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही.

दरम्यान दिग्विजय सिंह यांची निवडणूक लढविण्यासाठी पहिली पसंती राजगड मतदार संघाला होती. परंतु, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी भोपाळमधून लढविण्यास होकार दिला. या जागेवर तीन दशकापासून भाजपचे वर्चस्व आहे. सध्या अशोक झांवर या मतदार संघातून खासदार आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये २७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात सत्तांतर झाले असून काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान