शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 20:15 IST

sudhanshu trivedi hits back on rahul gandhi remarks on paper leak and nta

एनटीए आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाच राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता भाजपनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फ्रेन्सला भाजपनेही प्रेस कॉन्फ्रन्सच्याच माध्यमाने प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी भाजपने आपल्या सुधांशु त्रिवेदी आणि शहजाद पूनावाला या दोन तेज तर्रार प्रवक्त्यांना मैदानात उतरवले आहे. राहुल यांना प्रत्युत्तर देताना, सुधांशु त्रिवेदी यांनी केवळ प्रत्युत्तरच दिले नाही, तर बोचरे प्रश्नही विचारले. ते म्हणाले, राहुलजी राजस्थान विसरलात का? जेथे लोक सेवा आयोगाचा पेपरच फोडण्यात आला होता.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, NEET परीक्षेसंदर्भात सरकार पूर्णपणे सतर्क आणि संवेदनशील आहे. सरकार लाखो लोकांसोबत अन्याय होऊ देणार नाही. याला जे कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

करून दिली राजस्थानची आठवण - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "राहुल गांधी यांना लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही. या विषयावर त्यांना केवळ आपले राजकारण चमकवायचे आहे. राजस्थानात पेपर फुटला होता. मात्र, त्यावर राहुल गांधी चकार शब्दही बोलले नाही." सुधांशू त्रिवेदी यांनी राजस्थानचे उदाहरण दिले. कारण तेथे राज्य सेवा आयोगाच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची निवड करण्यात आली होती.

काय म्हणाले होते राहुल गांधी? -तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूजीसी-नेट आणि नीट-यूजीच्या परीक्षेत झालेल्या कथित पेपर फिटीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, "सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी." आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी