शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 20:15 IST

sudhanshu trivedi hits back on rahul gandhi remarks on paper leak and nta

एनटीए आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाच राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता भाजपनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फ्रेन्सला भाजपनेही प्रेस कॉन्फ्रन्सच्याच माध्यमाने प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी भाजपने आपल्या सुधांशु त्रिवेदी आणि शहजाद पूनावाला या दोन तेज तर्रार प्रवक्त्यांना मैदानात उतरवले आहे. राहुल यांना प्रत्युत्तर देताना, सुधांशु त्रिवेदी यांनी केवळ प्रत्युत्तरच दिले नाही, तर बोचरे प्रश्नही विचारले. ते म्हणाले, राहुलजी राजस्थान विसरलात का? जेथे लोक सेवा आयोगाचा पेपरच फोडण्यात आला होता.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, NEET परीक्षेसंदर्भात सरकार पूर्णपणे सतर्क आणि संवेदनशील आहे. सरकार लाखो लोकांसोबत अन्याय होऊ देणार नाही. याला जे कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

करून दिली राजस्थानची आठवण - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "राहुल गांधी यांना लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही. या विषयावर त्यांना केवळ आपले राजकारण चमकवायचे आहे. राजस्थानात पेपर फुटला होता. मात्र, त्यावर राहुल गांधी चकार शब्दही बोलले नाही." सुधांशू त्रिवेदी यांनी राजस्थानचे उदाहरण दिले. कारण तेथे राज्य सेवा आयोगाच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची निवड करण्यात आली होती.

काय म्हणाले होते राहुल गांधी? -तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूजीसी-नेट आणि नीट-यूजीच्या परीक्षेत झालेल्या कथित पेपर फिटीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, "सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी." आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी