शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:53 IST

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

Prashant Kishore : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून यश न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचं खापर फोडलं जात होतं. पराभवानंतर त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अशातच निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वादाचा फटका निवडणुकीत बसला का असा सवाल विचारण्यात आला होता.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं. यावेळी प्रशांत किशोर यांना राजकीय घडामोडींवर अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले. प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिली आहेत. यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारले की, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा पराभव योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यातील कथित मतभेदांमुळे झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

"मी याला वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाही. पण व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास मी २००९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देऊ शकतो. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. २००९ मध्ये गुजरातमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली नाही. पण मोदींच्या समर्थकांनी अडवाणींच्या प्रचाराला हानी पोहोचवली असे मी म्हणत नाही. अडवाणी जिंकले तर आमचे नेते मोदींना पंतप्रधान व्हायला अजून वेळ लागेल, असा संदेश पाठवला होता. कदाचित यावेळी उत्तर प्रदेशात हे घडले असावे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचंड बहुमताने जिंकले तर योगी आपली जागा गमावतील, असे काहींना वाटत होते. त्यावेळी केजरीवाल यांनी योगीबद्दल जे बोलले ते योग्यच ठरले," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

"मी बिहारमध्ये फिरत होतो तेव्हा लोक विचारत होते. 'लोक विचारत होते की ४०० जागा आल्या तर योगींना हटवणार का? यावरून हा संदेश समर्थकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. हा माझा विषय नाही आणि मी सहसा अशा विषयांवर बोलत नाही. मात्र योगींच्या समर्थकांमध्ये हा संदेश नक्कीच गेला आहे.," असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहPrashant Kishoreप्रशांत किशोर