शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:53 IST

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

Prashant Kishore : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून यश न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचं खापर फोडलं जात होतं. पराभवानंतर त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अशातच निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वादाचा फटका निवडणुकीत बसला का असा सवाल विचारण्यात आला होता.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं. यावेळी प्रशांत किशोर यांना राजकीय घडामोडींवर अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले. प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांना त्यांच्या शैलीत उत्तर दिली आहेत. यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारले की, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा पराभव योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यातील कथित मतभेदांमुळे झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं.

"मी याला वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाही. पण व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास मी २००९ च्या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देऊ शकतो. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. २००९ मध्ये गुजरातमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली नाही. पण मोदींच्या समर्थकांनी अडवाणींच्या प्रचाराला हानी पोहोचवली असे मी म्हणत नाही. अडवाणी जिंकले तर आमचे नेते मोदींना पंतप्रधान व्हायला अजून वेळ लागेल, असा संदेश पाठवला होता. कदाचित यावेळी उत्तर प्रदेशात हे घडले असावे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रचंड बहुमताने जिंकले तर योगी आपली जागा गमावतील, असे काहींना वाटत होते. त्यावेळी केजरीवाल यांनी योगीबद्दल जे बोलले ते योग्यच ठरले," असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

"मी बिहारमध्ये फिरत होतो तेव्हा लोक विचारत होते. 'लोक विचारत होते की ४०० जागा आल्या तर योगींना हटवणार का? यावरून हा संदेश समर्थकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. हा माझा विषय नाही आणि मी सहसा अशा विषयांवर बोलत नाही. मात्र योगींच्या समर्थकांमध्ये हा संदेश नक्कीच गेला आहे.," असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहPrashant Kishoreप्रशांत किशोर