शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

चीनच्या सांगण्यावरून भारताशी भिडला पाकिस्तान? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:39 IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जर्मन वृत्तपत्र 'फ्रँकफर्ट ऑलगेमिंग झीतुंग'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, ''पाकिस्तानकडे असलेली बरेचशी शस्त्रास्त्रे चीनची आहेत. दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. यावरून आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात.'' 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला होता. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने या दहशतवादी हल्ल्याचा बदलाही घेतला. यानंतर पाकिस्ताननेही भारताशी भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तान थंड झाला. दरम्यान या दोन्ही देशांतील तणाव अद्यापही कायम आहे. यातच आता, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावात चीनची कितपत भूमिका होती? यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भाष्य केले आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जर्मन वृत्तपत्र 'फ्रँकफर्ट ऑलगेमिंग झीतुंग'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, ''पाकिस्तानकडे असलेली बरेचशी शस्त्रास्त्रे चीनची आहेत. दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. यावरून आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात.'' 

पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम - परराष्ट्र मंत्रीजयशंकर म्हणाले, ''आम्ही दहशतवादी तळांना लक्ष्य केले. आमचे लक्ष्य अचूक होते आणि हे विचारपूर्वक उचलले गेलेले पाऊल होते. मात्र, यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर गोळीबार सुरू केला. यावर, आम्ही पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करू शकतो, हेही त्यांना दाखवून दिले. यानंतर, त्यांच्या विनंतीवरून गोळीबार थांहबवण्यात  आला.भारताने अनेक देशांत पाठवली शिष्टमंडळे -भारताने पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी जगभरात आपले शिष्टमंडळ पाठवले आहेत. एस जयशंकर म्हणाले, पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यित हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनोबलही खचले आहे. भाषाने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, परराष्ट्रमंत्र्यांनी जगभरात पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सर्व खासदारांचे सहकार्य मागितले आहे. ते म्हणाले, दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात भारताच्या भूमिकेला अनेक देशांनी पाठिंबा दिला. मात्र, चीन, अझरबैजान आणि तुर्की सारख्या फार कमी देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरBJPभाजपाPakistanपाकिस्तान