शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:09 IST

Uttarkashi Kalp Kedar Temple Story: उत्तराखंडमधील धराली येथे काल झालेल्या ढगफुटीच्या घटनेने अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह प्राचीन शिव मंदिर जमिनीखाली गाडले गेले आहे.

Uttarkashi Kalp Kedar Temple Story:उत्तराखंडमधील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरुन टाकले आहे. या घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, बचाव पथकांनी १३० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. सध्या धराली गावात लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन विभागाचे जवान आपले प्राण धोक्यात घालून बचाव मोहिम राबवत आहेत. या दुर्घटनेत अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह एक मंदिरदेखील ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या ऐतिहासिक मंदिराचे नाव 'कल्प केदार' आहे.

स्थानिकाच्या दाव्यानुसार, हे मंदिर खूप प्राचीन आहे. या मंदिराची वास्तुकला केदारनाथ धामसारखी आहे. म्हणूनच त्याचे नाव कल्प केदार आहे. लोक म्हणतात की, ज्याप्रमाणे केदारनाथ धामबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर वर्षानुवर्षे बर्फाखाली गाडले गेले होते, त्याचप्रमाणे कल्प केदार मंदिरदेखील जमिनीखाली गाडले गेले होते.

१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्राचीन मंदिरात १९ व्या शतकापासून पूजा सुरू झाली. असा दावा केला जातो की, १९४५ मध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाला, तेव्हा लोकांना खीर गंगेच्या काठावर मंदिराच्या शिखरासारखी रचना दिसली, म्हणून त्या जागेचे उत्खनन करण्यात आले. अनेक फूट जमीन खोदल्यानंतर हे प्राचीन शिवमंदिर बाहेर आले, ज्याची रचना केदारनाथ मंदिरासारखी होती.

१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडल्यानंतर पूजा सुरू झाली. उत्खननानंतरही मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली होते. भाविक मंदिरात खाली जाऊन पूजा करत असत. लोक म्हणतात की, खीरगंगेचे पाणी अनेकदा मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाजवळ येत असे. आता पुन्हा एकदा ढगफुटीच्या घटनेमुळे हे मंदिर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.

१८१६ मध्ये एका इंग्रजी प्रवाशाने याचा उल्लेख केलेला 

१८१६ मध्ये गंगा भागीरथीच्या उगमस्थानाचा शोध घेणारे इंग्रजी प्रवासी जेम्स विल्यम फ्रेझर यांनी त्यांच्या कथेत याचा उल्लेख केला आहे. जेम्स विल्यम फ्रेझर यांनी धरालीच्या मंदिरांमध्ये विश्रांती घेण्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १८६९ मध्ये गोमुखला पोहोचलेले इंग्रजी छायाचित्रकार आणि संशोधक सॅम्युअल ब्राउन यांनीदेखील धरालीतील तीन प्राचीन मंदिरांचे फोटो काढले, जे पुरातत्व विभागाकडे सुरक्षित आहेत. काही लोक म्हणतात की, हे मंदिर आदि शंकराचार्यांनी बांधले होते. तर काही म्हणतात की, येथे असलेले शिवलिंग पांडवांनी केदारनाथला आल्यावर स्थापित केले होते.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरTempleमंदिर