शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:09 IST

Uttarkashi Kalp Kedar Temple Story: उत्तराखंडमधील धराली येथे काल झालेल्या ढगफुटीच्या घटनेने अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह प्राचीन शिव मंदिर जमिनीखाली गाडले गेले आहे.

Uttarkashi Kalp Kedar Temple Story:उत्तराखंडमधील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरुन टाकले आहे. या घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, बचाव पथकांनी १३० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. सध्या धराली गावात लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन विभागाचे जवान आपले प्राण धोक्यात घालून बचाव मोहिम राबवत आहेत. या दुर्घटनेत अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह एक मंदिरदेखील ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या ऐतिहासिक मंदिराचे नाव 'कल्प केदार' आहे.

स्थानिकाच्या दाव्यानुसार, हे मंदिर खूप प्राचीन आहे. या मंदिराची वास्तुकला केदारनाथ धामसारखी आहे. म्हणूनच त्याचे नाव कल्प केदार आहे. लोक म्हणतात की, ज्याप्रमाणे केदारनाथ धामबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर वर्षानुवर्षे बर्फाखाली गाडले गेले होते, त्याचप्रमाणे कल्प केदार मंदिरदेखील जमिनीखाली गाडले गेले होते.

१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्राचीन मंदिरात १९ व्या शतकापासून पूजा सुरू झाली. असा दावा केला जातो की, १९४५ मध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाला, तेव्हा लोकांना खीर गंगेच्या काठावर मंदिराच्या शिखरासारखी रचना दिसली, म्हणून त्या जागेचे उत्खनन करण्यात आले. अनेक फूट जमीन खोदल्यानंतर हे प्राचीन शिवमंदिर बाहेर आले, ज्याची रचना केदारनाथ मंदिरासारखी होती.

१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडल्यानंतर पूजा सुरू झाली. उत्खननानंतरही मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली होते. भाविक मंदिरात खाली जाऊन पूजा करत असत. लोक म्हणतात की, खीरगंगेचे पाणी अनेकदा मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाजवळ येत असे. आता पुन्हा एकदा ढगफुटीच्या घटनेमुळे हे मंदिर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.

१८१६ मध्ये एका इंग्रजी प्रवाशाने याचा उल्लेख केलेला 

१८१६ मध्ये गंगा भागीरथीच्या उगमस्थानाचा शोध घेणारे इंग्रजी प्रवासी जेम्स विल्यम फ्रेझर यांनी त्यांच्या कथेत याचा उल्लेख केला आहे. जेम्स विल्यम फ्रेझर यांनी धरालीच्या मंदिरांमध्ये विश्रांती घेण्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १८६९ मध्ये गोमुखला पोहोचलेले इंग्रजी छायाचित्रकार आणि संशोधक सॅम्युअल ब्राउन यांनीदेखील धरालीतील तीन प्राचीन मंदिरांचे फोटो काढले, जे पुरातत्व विभागाकडे सुरक्षित आहेत. काही लोक म्हणतात की, हे मंदिर आदि शंकराचार्यांनी बांधले होते. तर काही म्हणतात की, येथे असलेले शिवलिंग पांडवांनी केदारनाथला आल्यावर स्थापित केले होते.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरTempleमंदिर