शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

बांगलादेशात महाराष्ट्राच्या खेळाडूवर मोठं संकट; तात्काळ शस्त्रक्रियेसाठी देशात आणण्याची धनंजय मुंडेंची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 08:55 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचा एक खेळाडू तिथे अडकून पडला आहे.

Bangladesh Violence Protests : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बांगलादेश सरकारने रविवारी देशभरात संचारबंदी वाढवली. बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, या हिंसक आंदोलनादरम्यान १२० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे देशात परतले आहेत. मात्र महाराष्ट्रातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशात अडकून पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका आजारामुळे काही तासांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या खेळाडूकडे लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र तिथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे इंद्रजित ढाकामध्ये अडकून पडलेला असून त्याच्याशी संपर्क होत नाहीये. अशातच आजारामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "बीडच्या अंबाजोगाई जिल्ह्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमी ढाका आयोजित बुद्धिबळ स्पर्धेसाठी बांगलादेश येथे गेला आहे. तो सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसाइटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील ७२ तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सध्या त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया सरकारने हस्तक्षेप करावा," असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बांगलादेश मुक्ती संग्रामातील सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनांनी सरकार हादरले आहे. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सैनिकांच्या नातेवाईकांसाठीचा कोटा ३० टक्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने रविवार आणि सोमवार सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या कालावधीत केवळ आपत्कालीन सेवांना काम करण्याची परवानगी असेल.

टॅग्स :BangladeshबांगलादेशDhananjay Mundeधनंजय मुंडे