शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

बांगलादेशात महाराष्ट्राच्या खेळाडूवर मोठं संकट; तात्काळ शस्त्रक्रियेसाठी देशात आणण्याची धनंजय मुंडेंची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 08:55 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचा एक खेळाडू तिथे अडकून पडला आहे.

Bangladesh Violence Protests : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बांगलादेश सरकारने रविवारी देशभरात संचारबंदी वाढवली. बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, या हिंसक आंदोलनादरम्यान १२० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे देशात परतले आहेत. मात्र महाराष्ट्रातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशात अडकून पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका आजारामुळे काही तासांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या खेळाडूकडे लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र तिथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे इंद्रजित ढाकामध्ये अडकून पडलेला असून त्याच्याशी संपर्क होत नाहीये. अशातच आजारामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "बीडच्या अंबाजोगाई जिल्ह्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमी ढाका आयोजित बुद्धिबळ स्पर्धेसाठी बांगलादेश येथे गेला आहे. तो सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसाइटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील ७२ तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सध्या त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया सरकारने हस्तक्षेप करावा," असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बांगलादेश मुक्ती संग्रामातील सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनांनी सरकार हादरले आहे. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सैनिकांच्या नातेवाईकांसाठीचा कोटा ३० टक्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने रविवार आणि सोमवार सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या कालावधीत केवळ आपत्कालीन सेवांना काम करण्याची परवानगी असेल.

टॅग्स :BangladeshबांगलादेशDhananjay Mundeधनंजय मुंडे