शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बांगलादेशात महाराष्ट्राच्या खेळाडूवर मोठं संकट; तात्काळ शस्त्रक्रियेसाठी देशात आणण्याची धनंजय मुंडेंची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 08:55 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचा एक खेळाडू तिथे अडकून पडला आहे.

Bangladesh Violence Protests : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बांगलादेश सरकारने रविवारी देशभरात संचारबंदी वाढवली. बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, या हिंसक आंदोलनादरम्यान १२० भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे देशात परतले आहेत. मात्र महाराष्ट्रातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशात अडकून पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका आजारामुळे काही तासांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या खेळाडूकडे लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र तिथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे इंद्रजित ढाकामध्ये अडकून पडलेला असून त्याच्याशी संपर्क होत नाहीये. अशातच आजारामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "बीडच्या अंबाजोगाई जिल्ह्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमी ढाका आयोजित बुद्धिबळ स्पर्धेसाठी बांगलादेश येथे गेला आहे. तो सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसाइटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील ७२ तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सध्या त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया सरकारने हस्तक्षेप करावा," असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बांगलादेश मुक्ती संग्रामातील सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या घोषणेनंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनांनी सरकार हादरले आहे. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सैनिकांच्या नातेवाईकांसाठीचा कोटा ३० टक्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने रविवार आणि सोमवार सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या कालावधीत केवळ आपत्कालीन सेवांना काम करण्याची परवानगी असेल.

टॅग्स :BangladeshबांगलादेशDhananjay Mundeधनंजय मुंडे