शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 05:19 IST

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविणे ही प्रत्येक भारतीयाची महत्त्वाकांक्षा असून, थेट लोकांशी जोडलेले असल्यामुळे राज्ये यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

‘नीती आयोगा’च्या ९ व्या बैठकीत ते बोलत होते. आयोगाने समाज माध्यम मंच ‘एक्स’वर याची माहिती दिली. मोदी यांनी म्हटले की, भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची महत्त्वाकांक्षा आहे. यात राज्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. कारण, त्यांचा लोकांशी थेट संबंध असतो.

मोदी यांनी म्हटले की, ‘हे दशक तंत्रज्ञान आणि भू-राजकीय बदलांप्रमाणेच संधींचेही आहे. या संधीचा लाभ भारताने उठवायला हवा. त्यासाठी आपली धोरणे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला अनुकूल बनवायला हवीत. भारतास विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने नेण्यासाठी हा एक मार्ग आहे.’

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती. केंद्र व राज्य सरकारांत सहकार्य वाढविणे, वितरण प्रणाली मजबूत करून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचावणे हे उद्देशही बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर होते. नीती आयोगाच्या शासक परिषदेसाठी (गव्हर्निंग कौन्सिल) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला गैरहजर होते. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.

‘शून्य गरिबी’ संकल्पनेवर चर्चा

नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी पत्रकारांना सांगितले की, आजच्या बैठकीत भू-राजकीय (डेमॉग्राफिक) व्यवस्थापन आणि शून्य गरिबी संकल्पना यावरही चर्चा झाली. ही संकल्पना खेडेगाव लक्ष्य ठेवून राबवावी, अशी सूचना राज्यांनी केली. योग्य मूल्यांकनानंतर ‘शून्य गरिबी गाव’ घोषित केले जाऊ शकते, असेही सूचविण्यात आले. राज्यांनी जिल्ह्यावर अधिक खर्च करावा, ज्यामुळे ते वृद्धीचे चालक बनू शकतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

राज्यांनी एफडीआयसाठी स्पर्धा करावी

नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सांगितले की, राज्यांनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) एकमेकांशी स्पर्धा करायला हवी, असे पंतप्रधानांनी सांगितले. विशेषत: कमी यश मिळणाऱ्या राज्यांनी जोमदारपणाने स्पर्धेत उतरावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार