शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 05:19 IST

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविणे ही प्रत्येक भारतीयाची महत्त्वाकांक्षा असून, थेट लोकांशी जोडलेले असल्यामुळे राज्ये यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

‘नीती आयोगा’च्या ९ व्या बैठकीत ते बोलत होते. आयोगाने समाज माध्यम मंच ‘एक्स’वर याची माहिती दिली. मोदी यांनी म्हटले की, भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची महत्त्वाकांक्षा आहे. यात राज्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. कारण, त्यांचा लोकांशी थेट संबंध असतो.

मोदी यांनी म्हटले की, ‘हे दशक तंत्रज्ञान आणि भू-राजकीय बदलांप्रमाणेच संधींचेही आहे. या संधीचा लाभ भारताने उठवायला हवा. त्यासाठी आपली धोरणे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला अनुकूल बनवायला हवीत. भारतास विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने नेण्यासाठी हा एक मार्ग आहे.’

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती. केंद्र व राज्य सरकारांत सहकार्य वाढविणे, वितरण प्रणाली मजबूत करून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचावणे हे उद्देशही बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर होते. नीती आयोगाच्या शासक परिषदेसाठी (गव्हर्निंग कौन्सिल) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला गैरहजर होते. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.

‘शून्य गरिबी’ संकल्पनेवर चर्चा

नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी पत्रकारांना सांगितले की, आजच्या बैठकीत भू-राजकीय (डेमॉग्राफिक) व्यवस्थापन आणि शून्य गरिबी संकल्पना यावरही चर्चा झाली. ही संकल्पना खेडेगाव लक्ष्य ठेवून राबवावी, अशी सूचना राज्यांनी केली. योग्य मूल्यांकनानंतर ‘शून्य गरिबी गाव’ घोषित केले जाऊ शकते, असेही सूचविण्यात आले. राज्यांनी जिल्ह्यावर अधिक खर्च करावा, ज्यामुळे ते वृद्धीचे चालक बनू शकतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

राज्यांनी एफडीआयसाठी स्पर्धा करावी

नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सांगितले की, राज्यांनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) एकमेकांशी स्पर्धा करायला हवी, असे पंतप्रधानांनी सांगितले. विशेषत: कमी यश मिळणाऱ्या राज्यांनी जोमदारपणाने स्पर्धेत उतरावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार