शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कटू सत्य ऐकण्याची सवय करा; स्वामींचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 10:05 AM

अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन थेट पंतप्रधानांवर निशाणा

मुंबई: कटू सत्य ऐकण्याची तयारी ठेवा आणि प्रशासनातील अर्थतज्ज्ञांना घाबरवणं सोडा, अशा शब्दांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला आहे. देश आणि अर्थव्यवस्था चालवायची असल्यास ऐकून घेण्याची वृत्ती असायला हवी. मात्र मोदींनी अद्याप तशी सवय करुन घेतलेली नाही, असं स्वामी म्हणाले. स्वामी यांनी याआधीही देशातील अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मोदींच्या कामाची पद्धत पाहता खूपच कमी व्यक्ती त्यांच्यासमोर बोलू शकतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मनमोकळेपणानं त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. मात्र अद्याप मोदींनी अशी सवय लावून घेतलेली नाही,' अशा शब्दांमध्ये स्वामींनी मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य अवस्थेतून जात असताना स्वामींनी मोदींवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारनं कॉर्पोरेट करात कपात केली आहे. याशिवाय आणखीही पावलं उचलली आहेत. मात्र अद्याप याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसलेले नाहीत.नोटबंदी आणि घाई गडबडीत लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेतील मंदीला कारणीभूत असल्याचं स्वामी म्हणाले. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय नेमक्या समस्यांवर काम करत नसल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील संकट अधिक गहिरं होत असल्याचंही ते म्हणाले. 'अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्रिस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ काळासाठी स्वतंत्र धोरणं आखायला हवीत. मात्र सध्या अशी कोणतीही धोरणं अस्तित्वात नाहीत. पंतप्रधानांना अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगण्याची हिंमत प्रशासनातील एकही अर्थतज्ज्ञ करत नसेल. कारण मोदींना कटू सत्य ऐकण्याची सवय नाही,' असं स्वामी यांनी म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEconomyअर्थव्यवस्थाGSTजीएसटीDemonetisationनिश्चलनीकरण