शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:25 IST

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे.

शिमला:हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, कुल्लूमधील निर्मंद, सेंज, मलाना, मंडीतील पदर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. समेज खुड (नाला) मध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि इतर २८ जण बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.

राज्यात बुधवारपासून मुसळधार

हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक २१२ मिमी पावसाची नोंद पालमपूरमध्ये झाली. यानंतर चौरीमध्ये २०३, धर्मशालामध्ये १८३.२ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

अमित शाह यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दु:ख व्यक्त केले.

देशात कुठे काय झाले?

-दिल्लीत मुसळधार पाऊस, विविध दुर्घटनांत तीन ठार-पंजाब-हरयाणात जोरदार पाऊस, प. बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा.-बिहारच्या जेहानाबाद आणि रोहतास जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू.-पावसाळ्यात मध्य प्रदेशातील ३ जिल्ह्यांमध्ये अतिसारामुळे १७ जणांचा मृत्यू.-गुरुग्रामममध्ये मुसळधार पावसामुळे मेट्रो रेल्वेस्थानकाजवळ तिघांना विजेचा धक्का बसला.-पाकिस्तानच्या लाहोरमध्ये धुँवाधार पाऊस, एक ठार , ४४ वर्षांतील सर्वाधिक पाऊस येथे झाला आहे.-जयपूरमधील घराच्या तळघरात पावसाचे पाणी घुसून पती-पत्नी, भाची बुडाली.-उत्तराखंडमध्ये ७ जणांचा मृत्यू.

 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशdelhiदिल्लीHaryanaहरयाणाBiharबिहारRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश