शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

रोख्यांचा तपशील अखेर सादर; SCच्या आदेशानंतर SBIची कार्यवाही, १५ मार्चला आयोग प्रसिद्ध करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 5:47 AM

२०१९ साली निवडणूक रोख्यांची योजना अंमलात आली. तेव्हापासून सुमारे ३० टप्प्यात एसबीआयने १६,५१८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक रोख्यांच्या व्यवहाराबाबतचा सविस्तर तपशील स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मंगळवारी निवडणूक आयोगाला सादर केला. हे तपशील निवडणूक आयोगाला आपल्या वेबसाइटवर येत्या १५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रकाशित करावे लागतील.

२०१९ साली निवडणूक रोख्यांची योजना अंमलात आली. तेव्हापासून सुमारे ३० टप्प्यात एसबीआयने १६,५१८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे निवडणूक रोख्यांची योजना रद्दबातल केली होती. 

घटनात्मकदृष्ट्या ही योजना अवैध असून, देणगीदारांनी दिलेली रक्कम, कोणाला देणग्या मिळाल्या आदी सर्व तपशील सर्वांच्या माहितीसाठी उघड करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

रोख्यांचे अधिकार एसबीआयकडे 

- निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यासाठी एसबीआयने ३० जूनपर्यंतची मागितलेली मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने नाकारली होती. हा सर्व तपशील मंगळवारी एसबीआयने निवडणूक आयोगाला सादर करावा असा आदेशही न्यायालयाने दिला होता. 

- याआधी राजकीय पक्षांना रोख रकमेच्या स्वरूपात देणग्या मिळत असत. पण ती पद्धत बंद करून निवडणूक रोख्यांची योजना केंद्र सरकारने सुरू केली. 

- मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे देणग्या मिळण्याची सोय उपलब्ध झाली. 

- त्यासाठी एसबीआयमध्ये राजकीय पक्षांची बँक खातीही उघडण्यात आली. निवडणूक रोखे जारी करण्याचा अधिकार फक्त एसबीआयलाच होता.

देणगीदारांना असुरक्षित वाटण्याची शक्यता

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविलेल्या पत्रात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्गरवाला यांनी म्हटले आहे की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या उद्योगांची, उद्योजकांची नावे उघड झाल्यास देणगीदारांना असुरक्षित वाटण्याची शक्यता आहे. 

कोणत्या उद्योग, उद्योजकांनी कोणकोणत्या राजकीय पक्षांनी किती देणग्या दिल्या याचे आकडे जाहीर झाल्यास कमी देणग्या मिळालेल्या पक्षांकडून देणगीदारांना त्रास होण्याची शक्यता आहे. 

राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणगी देताना देणगीदाराचे नाव गोपनीय राखण्यात येईल अशी या योजनेत तरतूद होती. पण, देणग्यांच्या तपशील जाहीर केल्यास या तरतुदीचा भंग होणार आहे, असे आदिश अग्गरवाला यांनी म्हटले आहे.

अभिमत मागविण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

निवडणूक रोखे योजना रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर त्या न्यायालयाकडून अभिमत मागवावे, अशी मागणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्गरवाला यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अभिमत मिळाल्यानंतर त्या प्रकरणाची फेरसुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निकाल अंमलात आणू नये, अशीही मागणी अग्गरवाला यांनी केली.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बॅक ऑफ इंडियाSBIएसबीआयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग