शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

देश-परदेश लालू आंबे

By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क

लिची, आंब्यावर माझा आणि राबडीचाच हक्क
लालूप्रसाद यादव: झाडे मी लावली होती
पाटणा: बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असणार्‍या झाडांचे फळे कोणी घ्यायची यावरुन जितनराम मांझी आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चाललेल्या वादात आणखी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. या बंगल्याच्या बागेतील फळे खाण्याचा पहिला अधिकार माझा व माझी पत्नी राबडीदेवी यांचाच आहे, कारण ती झाडे मी लावली आहेत असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी या वादामध्ये प्रवेश केला आहे.
लिची और आम के पेड पर मेरा और राबडीका हक है, हमने ही वहाँ पेड लगाये थे, असे सांगत लालू प्रसाद यांनी त्या फळांवर हक्क सांगितला आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरी मांझी यांनी १, अणे मार्ग हा बंगला सोडलेला नाही. त्यामुळे, या बंगल्याच्या बागेतील झाडांची फळे त्यांना मिळू नयेत यासाठी नितिशकुमार यांनी झाडांची राखण करण्यासाठी पोलीस शिपायांची नेमणूक केली आहे. त्यावरुनच हा वाद सुरु झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रभावी असणारे महादलित कार्ड खेळत नितीशकुमार यांनी मांझी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण आधी केवळ प्यादे वाटणारे मांझी नितीशकुमार यांच्यावरच चाल करून गेल्यावर त्यांना हटविण्यात आले. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी जितनराम मांझी व नितिश यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चौकट:
फळझाडांची मुळे कुठवर?
वरवर बालिश वाटणार्‍या या वादाचा संबंध बिहारच्या आगामी निवडणुकांमुळे तापत चाललेल्या राजकारणाशी आहे. लिची, आंब्याच्या या वादात भाजपानेही प्रवेश केला आहे. भाजपा आणि जितनराम मांझी यांनी नितिशकुमार यांनी आपल्या कृत्यातून महादलितांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नितीश यांनी मी आवाम(जनता) ची काळजी करतो तर मांझी आम (आंबे)ची काळजी करत बसले आहेत असा टोमणा मारला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकले असले तरी त्यांचे खरे मनोमिलन अद्याप झालेले नाही. आता लोहियांचे हे शिष्य फळांसाठी असेच भांडत बसतात का समाजवादी तत्वाला जागून फळे वाटून खातात ते पाहता येईल.