शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:43 IST

कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ कारवाई करण्याची सूचना

नवी दिल्ली- भारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे.

मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्यासंदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.

टॅग्स :marriageलग्नWomenमहिलाwomen and child developmentमहिला आणि बालविकासIndiaभारत