शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 13:43 IST

कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ कारवाई करण्याची सूचना

नवी दिल्ली- भारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे.

मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्यासंदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.

टॅग्स :marriageलग्नWomenमहिलाwomen and child developmentमहिला आणि बालविकासIndiaभारत