शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

बिहारमध्ये पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:01 IST

Deputy Commissioner Love Marriage: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे.

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. अपहरण प्रकरणीतील आरोपी शिव शक्ती कुमार यांनी नात्याने त्यांची पुतणी लागणाऱ्या सजल सिंधू नावाच्या तरुणीसोबत विवाह केल्याचे उघड झाले आहे. या दोघांनीही खगडिया येथील कात्यायानी मंदिरात जाऊन लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर नवदाम्पत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून या दाम्पत्याने आपलं म्हणणं समोर मांडलं आहे.  आम्ही विवाह केला असून, अपहरणाबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर पूर्णपणे खोटी आहे, असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे.

दरम्यान, सजल सिंधू हिने हा व्हिडीओ मानवाधिकार आयोग, बार कौन्सिल आणि सरन्यायाधीशांना मेल केला आहे. तर शिव शक्ती कुमार यांनी आपल्या जीवितास धोका अससल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र हे दोघेही अद्याप सर्वांसमोर आलेले नाहीत. शिव शक्ती कुमार हे त्यांच्या बेगुसरायमधील कार्यालयात पोहोचलेले नाहीत. तसेच ते घरीही गेलेले नाहीत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य खगडिया येथे एका गुप्त ठिकाणी राहत आहे. शिव शक्ती कुमार यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, जर तुम्ही प्रेम करत असाल तर तुमचं प्रेमाप्रति समर्पण असलं पाहिजे.  आर्थिक मोह आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या आहारी जाता कामा नये. आम्ही प्रेमाप्रति समर्पण दाखवलं आहे.  

ते पुढे म्हणाले की, आमच्याविरोधात वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर सदर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अपहरण किंवा इतर कुठलंही अनैतिक काम केलेलं नाही. आम्ही प्रेमविवाह केला आहे. आता आमच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रशासनाने सुरक्षा पुरवावी. नैतिकतेच्या नावाखाली लोकांच्या हिंसक होण्यामुळे आम्ही स्वत:ला असुरक्षित समजत आहोत, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवारBiharबिहार