शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विद्यार्थी सुखावले : महिन्यातून दोन शनिवारी दप्तराला सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:08 IST

विद्यार्थी सुखावले : जगनमोहन सरकारचा निर्णय; विद्यार्थी मोकळ्या वातावरणात घेणार शिक्षण

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी दप्तराचे ओझे असणार नाही. विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेता येण्यासाठी आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्व खासगी व सरकारी शाळांसाठी बंधनकारक आहे.

या निर्णयाचे पालक, विविध शाळा, शिक्षक तसेच शिक्षणक्षेत्रातील अनेक संघटनांनी स्वागत केले आहे. विनादप्तर दिनाची संकल्पना पालक, विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगावी असा आदेश राज्य सरकारने सर्व शाळांना दिला आहे. विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. या रगाड्यात ते खेळण्याचेही अनेकदा विसरून जातात. पाठीवरील वजनदार दप्तरामुळे अनेक मुलांना पाठीचे, मानेचे आजारही जडतात. या गोष्टींपासून वाचण्यासाठी मुलांना विनादप्तर दिन अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी एम. व्ही. राज्यलक्ष्मी यांनी सांगितले की, विनादप्तर दिनामुळे विद्यार्थ्यांना अधिक मोकळेपणाने शिक्षण घेता येईल. माध्यमिक स्तरालाही लागू कराच्केवळ प्राथमिक स्तरावरीलच नव्हे तर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठीही विनादप्तर दिनाचा निर्णय लागू करावा अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)चे राज्य सहसचिव एस. नरसिंहम यांनी केली आहे.च्विनादप्तर दिन निर्णयाची खासगी शाळांतून नीट अंमलबजावणी होत आहे का याकडेही सरकारने बारीक लक्ष ठेवावे असे दुसºया इयत्तेत शिकणाºया एका मुलाचे वडील बाथिना रघुराम यांनीसांगितले.च्मुलांच्या दप्तराचे वजन कमी करण्याची गरज आहे असे पत्र कृष्णा जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष बी. व्ही. एस. कुमार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना लिहिले होते.च्माझ्या दप्तरात किमान वीस वह्या-पुस्तके असतात. ते ओझे घेऊन शाळेत येताना व घरी परत जाताना माझी दमछाक होते. आता महिन्यातून दोन दिवस तरी त्यातून आमची सुटका होईल.च्आपल्या सूचनेनुसार निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. पी. सृजना या पाचवी इयत्तेतील विद्यार्थीनीने सांगितले की, विनादप्तर दिनाच्या दिवशी पाठीवर कोणतेही ओझे न घेता मला शाळेत यायला मिळणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाAndhra Pradeshआंध्र प्रदेशStudentविद्यार्थी