शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:27 IST

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात आज राजधानी दिल्लीत संविधान बचाव कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. 'हे लोक मशिदीखाली मंदिर असल्याचे सांगत आहेत. पण, मोहन भागवत 2022 मध्ये म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीखाली शिवालय शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या लोकांचे म्हणनेच ऐकत नाही.'

ताजमहाल-लाल किल्लाही पाडा'1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांची स्थिती कायम ठेवण्यासाठी 1991 मध्ये कायदा करण्यात आला होता, मात्र त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे मोहन भागवतांचे विधान केवळ दिखाव्यासाठी आहे, असे मला वाटते. भाजपवाल्यांनी आता लाल किल्ला, कुतुबमिनार, ताजमहाल अन् हैदराबादचे चार मिनारही पाडा. हे सर्व मुस्लिमांनी बांधले आहे. मी स्वतः हिंदू आहे. माझे नाव मल्लिकार्जुन आहे. माझे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण, मी सेक्युलर हिंदू आहे. तुम्ही सेक्लुयर हिंदूंना मानत नाही. वक्फ विधेयकालाही आमचा विरोध आहे. कुठेतरी चूक झाली असेल तर ती सुधारता येते, पण तोडफोड देशाला विनाशाकडे घेऊन जाईल,' असेही खरगे यावेळी म्हणाले.

खरगेंची x पोस्टमल्लिकार्जु खरगेंनी आजच्या कार्यक्रमानंतर एक्स पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, 'आज ऐतिहासिक रामलीला मैदानावर संविधान वाचवण्यासाठी, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आणि जात जनगणनेसाठी काढण्यात आलेल्या रॅलीसाठी देशभरातून आलेल्या तुमच्या सर्व मित्रांचे मी अभिनंदन करतो. मी दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांच्या महासंघाचेही अभिनंदन करतो, ज्यांच्या झेंड्याखाली एक छोटासा भारत येथे एकत्र आला आहे. ही रॅली विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे.'

'गेल्या 11 वर्षात भाजपने सातत्याने संविधान, घटनात्मक संस्था आणि लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमांवर बंधने आली, पत्रकारांना तुरुंगात टाकले. संविधान बदलण्यासाठी भाजप नेत्यांनी उघडपणे 400 जागांची मागणी करण्यास सुरुवात केली. अशा वातावरणात राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतर मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या यात्रांनी काँग्रेस पक्षाचे आणि जनतेचे मुद्दे मांडले. तुम्ही सगळे इथे या ऐतिहासिक रामलीला मैदानात जमले आहात, कारण हे मुद्दे आजही संपलेले नाहीत. देशातील तरुण, कामगार, दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांच्या समस्या असलेल्या अशा मुद्द्यांवर तुम्ही सर्वजण लढत आहात याचा मला आनंद आहे.'

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा