शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:27 IST

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात आज राजधानी दिल्लीत संविधान बचाव कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. 'हे लोक मशिदीखाली मंदिर असल्याचे सांगत आहेत. पण, मोहन भागवत 2022 मध्ये म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीखाली शिवालय शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या लोकांचे म्हणनेच ऐकत नाही.'

ताजमहाल-लाल किल्लाही पाडा'1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांची स्थिती कायम ठेवण्यासाठी 1991 मध्ये कायदा करण्यात आला होता, मात्र त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे मोहन भागवतांचे विधान केवळ दिखाव्यासाठी आहे, असे मला वाटते. भाजपवाल्यांनी आता लाल किल्ला, कुतुबमिनार, ताजमहाल अन् हैदराबादचे चार मिनारही पाडा. हे सर्व मुस्लिमांनी बांधले आहे. मी स्वतः हिंदू आहे. माझे नाव मल्लिकार्जुन आहे. माझे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण, मी सेक्युलर हिंदू आहे. तुम्ही सेक्लुयर हिंदूंना मानत नाही. वक्फ विधेयकालाही आमचा विरोध आहे. कुठेतरी चूक झाली असेल तर ती सुधारता येते, पण तोडफोड देशाला विनाशाकडे घेऊन जाईल,' असेही खरगे यावेळी म्हणाले.

खरगेंची x पोस्टमल्लिकार्जु खरगेंनी आजच्या कार्यक्रमानंतर एक्स पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, 'आज ऐतिहासिक रामलीला मैदानावर संविधान वाचवण्यासाठी, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आणि जात जनगणनेसाठी काढण्यात आलेल्या रॅलीसाठी देशभरातून आलेल्या तुमच्या सर्व मित्रांचे मी अभिनंदन करतो. मी दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांच्या महासंघाचेही अभिनंदन करतो, ज्यांच्या झेंड्याखाली एक छोटासा भारत येथे एकत्र आला आहे. ही रॅली विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे.'

'गेल्या 11 वर्षात भाजपने सातत्याने संविधान, घटनात्मक संस्था आणि लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमांवर बंधने आली, पत्रकारांना तुरुंगात टाकले. संविधान बदलण्यासाठी भाजप नेत्यांनी उघडपणे 400 जागांची मागणी करण्यास सुरुवात केली. अशा वातावरणात राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतर मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या यात्रांनी काँग्रेस पक्षाचे आणि जनतेचे मुद्दे मांडले. तुम्ही सगळे इथे या ऐतिहासिक रामलीला मैदानात जमले आहात, कारण हे मुद्दे आजही संपलेले नाहीत. देशातील तरुण, कामगार, दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांच्या समस्या असलेल्या अशा मुद्द्यांवर तुम्ही सर्वजण लढत आहात याचा मला आनंद आहे.'

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा