शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

"फक्त लाल किल्ला का, फतेहपूर सिक्री आणि ताजमहालही मागा"; सरन्यायाधीशांनी हसत फेटाळली सुलताना बेगम यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:24 IST

लाल किल्ला परत करण्याची याचिका करणाऱ्या सुलताना बेगम यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे.

Supreme Court: मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या वारसदार असल्याचा दावा करणाऱ्या सुलताना बेगम यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुलताना बेगम यांनी आपण बहादूर शाह जफर (द्वितीय) यांचे कायदेशीर वारस असल्याचा दावा केला होता. याचिकेत सुलताना बेगम यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याचा ताबा देण्याची मागणी केली होती. याआधी दिल्ली हायकोर्टाने सुलताना बेगम यांची याचिका फेटाळून लावली होती. हायकोर्टाच्या निर्णयाला सुलताना बेगम यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र लाल किल्ल्याचा ताबा मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी हसत ही याचिका फेटाळून लावली.

मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांची वारसदार असल्याचा दावा करणाऱ्या सुलताना बेगम यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने नकार दिला आणि ती चुकीची असल्याचे म्हटलं. तुम्ही फक्त लाल किल्ल्याची मागणी का करत आहात, फतेहपूर सिक्री, ताजमहाल इत्यादींची मागणी का केली नाही, असा सवाल सरन्यायाधीश खन्ना यांनी केला. सुलताना बेगम यांनी याचिकेत लाल किल्ल्याचा ताबा देण्याची मागणी केली होती. कोलकाताजवळील हावडा येथे राहणाऱ्या बेगम यांनी २०२१ मध्येच पहिल्यांदा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुलताना बेगम यांना आशा होती की सरकार त्यांच्याकडे लक्ष देईल आणि त्यांना आर्थिक मदत करेल. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली.

सुरुवातीपासून दाखल केलेली रिट याचिका चुकीची आणि निराधार होती. ही याचिका विचारात घेता येत नाही, असं सरन्यायाधिशांनी म्हटलं. सुलताना बेगम यांच्या वकिलाला याचिका मागे घेण्याची परवानगी देण्यासही कोर्टाने नकार दिला. सुलताना बेगम यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की त्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. यावर सरन्यायाधीशांनी त्यांना टोमणा मारला. "फक्त लाल किल्ला का? फतेहपूर सिक्री का नाही? तो का वगळण्यात आला? ही मागणी पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे ती फेटाळण्यात आली आहे," असे सरन्यायाधीश खन्ना म्हणाले.

डिसेंबर २०२३ मध्ये, दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने त्यांचे अपील फेटाळून लावले होते. सुलताना बेगम यांनी यासंदर्भातील याचिका दाखल करण्यास  अधिक उशीर केल्याचे कोर्टाने नमूद केले होते. त्यावेळी न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाल्या होत्या की, माझा इतिहास खूपच कमकुवत असला तरी तुम्ही १८५७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तुमच्यावर अन्याय केला असा दावा करता, मग तुम्ही याचिका करायला १५० वर्षांहून अधिक काळ का लावला? इतकी वर्षे तुम्ही काय करत होता? 

यावर सुलताना बेगम यांचे वकील विवेक मोरे यांनी उत्तर दिले होते. "जेव्हा हे लोक परदेशातून परतले तेव्हा स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुलताना बेगम यांचे पती मिर्झा बेदर बख्त यांचे पेन्शन मंजूर केले होते. सुलताना बेगम यांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर हे पेन्शन मिळत असले तरी, दरमहा ६००० रुपयांमध्ये काय होते ते सांगा. सुलताना बेगमची प्रकृती खूपच वाईट आहे," असं सुलताना बेगम यांचे वकील विवेक मोरे यांनी म्हटलं होतं.

१८५७ च्या उठावादरम्यान ब्रिटिशांनी लाल किल्ला ताब्यात घेतल्यानंतर आमच्या कुटुंबाने त्याचा ताबा गमावल्याचा दावा सुलताना बेगम यांनी केला. त्यानंतर, सम्राट बहादूर शाह जफर यांना हद्दपार करण्यात आले आणि लाल किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतला. लाल किल्ला त्यांना पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळाला होता आणि आता भारत सरकारने त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. एकतर लाल किल्ला आम्हाला परत करावा किंवा योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी सुलताना बेगम यांनी केला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRed Fortलाल किल्लाTaj Mahalताजमहाल