रिक्षांवरील कारवाई थांबविण्याची मागणी

By Admin | Updated: April 24, 2016 00:39 IST2016-04-24T00:39:14+5:302016-04-24T00:39:14+5:30

अहमदनगर : शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर चोरट्या वाहतुकीचे कलम लावून कारवाई केली जात आहे़ ही कारवाई थांबवावी अशी मागणी जिल्हा रिक्षा पंचायतच्यावतीने वाहतूक शाखेचे नियंत्रक अजित लकडे यांच्याकडे करण्यात आली़ याबाबत लकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी हमीद देशमुख, राऊफ पठाण, बाळू गायकवाड, विलास शिंदे, साबीर शेख, गणेश बेंद्रे, दिलीप वारे, लखापती आदी उपस्थित होते़

Demand for stoppage of rickshaw | रिक्षांवरील कारवाई थांबविण्याची मागणी

रिक्षांवरील कारवाई थांबविण्याची मागणी

मदनगर : शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांवर चोरट्या वाहतुकीचे कलम लावून कारवाई केली जात आहे़ ही कारवाई थांबवावी अशी मागणी जिल्हा रिक्षा पंचायतच्यावतीने वाहतूक शाखेचे नियंत्रक अजित लकडे यांच्याकडे करण्यात आली़ याबाबत लकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी हमीद देशमुख, राऊफ पठाण, बाळू गायकवाड, विलास शिंदे, साबीर शेख, गणेश बेंद्रे, दिलीप वारे, लखापती आदी उपस्थित होते़

पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
अहमदनगर : शेवगाव येथे मुख्यालय असलेल्या वीज कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली़ निवडणुकीत राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना व महाराष्ट्र वीज कामगार महासंघ पुरस्कृत सदिच्छा मंडळाचे वर्चस्व कायम राहिले आहे़ निवडणुकीत सदिच्छा मंडळाचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले़ बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अशोक पाथरकर, माधव पटारे, सुरेश लवांडे, भाऊसाहेब भाकरे, नंदकिशोर राऊत, संतोष जगताप, सचिन मुळे, शिवाजी चितळकर, प्रवीण जठार, अशोक साळुंके, सवित्रराव रोहोकले, विजय ढवण, शाम मेने, संजय दुधारे, अमोल गारुडकर, मनिषा पाठक, सुशीला तेलोरे यांचा समावेश आहे़

Web Title: Demand for stoppage of rickshaw