शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

दिल्लीतील लाल किल्ला माझ्या मालकीचा, मालकी हक्कासाठी महिलेने थेट कोर्टात घेतली धाव, कोर्टाने मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 1:56 PM

Red Fort News: दिल्लीतील लाल किल्ला हा आपल्या मालकीचा आहे, असा दावा करत कोर्टात धाव घेणाऱ्या महिलेची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सुल्ताना बेगम असे आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ला हा आपल्या मालकीचा आहे, असा दावा करत कोर्टात धाव घेणाऱ्या महिलेची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सुल्ताना बेगम असे असून, ती मुघल बादशाह बहादूरशाह जफर-२ यांच्या पणतूची विधवा असल्याचा दावा करते. याचिकाकर्त्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेनुसार १८५७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जबरदस्तीने मुघल बादशाहला लाल किल्ल्यामधून बाहेर काढून त्यावर कब्जा केला होता. तसेच आता भारत सरकारने त्यांच्या पूर्वजांच्या संपत्तीवर कब्जा केलेला आहे.

न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या बेंचने सुल्ताना बेगम यांची याचिका फेटाळून लावताना सांगितले की, ही याचिका खूप उशिराने दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, दुर्दैवाने तुम्ही खटला तयार न करताच याचिका दाखल केली आहे. तुमच्या म्हणण्यानुसार हे सर्व १८५७ ते १९४७ दरम्यान घडले. तुम्ही नेमकी काय समस्या आहे हेही याचिकेमध्ये नमूद केलेले नाही. याचिकाकर्ता महिला ही अशिक्षित असली तरी त्यांच्या पूर्वजांनी त्याचवेळी किंवा नंतर ईस्ट इंडिया कंपनीविरोधात कुठलाही कारवाई का केली नाही, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला.

अॅडव्होकेट विवेक मोर यांच्या माध्यमातून दाखल याचिकेमध्ये बेगम यांनी सांगितले की, १८५७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने दिल्लीचे बादशाह बहादूरशाह जफर-२ यांच्याकडून सिंहासन काढून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला होता. तसेच बहादूरशाह जफर यांना देशद्रोहाप्रकरणी दोषी ठरवून त्यांना निर्वासित करून कुटुंबासह रंगून येथे पाठवले होते. तिथे त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता. १८६२ मध्ये बहादूरशाह जफर यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांचे वय ८२ होते.

या याचिकेमध्ये सांगितले की, १९४७ मध्ये रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि येथील सत्ता भारत सरकारजवळ आली, तेव्हा जफर यांचे पणतू बेदार बख्त यांना त्यांचा उत्तराधिकारी मानून १९६० मध्ये पेन्शन सुरू करण्यात आली. बख्त हा आपला पती असल्याचे सांगत बेगम यांनी याचिकेमध्ये सांगितले की, पतीच्या मृत्यूनंतर त्यांना पेंन्शन देण्यात आली. ही एवढी लहान रक्कम होती की, त्यामुळे आता उदरनिर्वाह करणे कठीण आहे.

याचिकारकर्त्यांनी हेही सांगितले की, आता भारत सरकार अनधिकृतपणे त्यांच्या वडीलोपार्जित संपत्तीवर कब्जा करून बसले आहे. त्यामुळे लाल किल्ला हा आपल्या स्वाधीन करण्याचे आदेश कोर्टाने भारत सरकारला द्यावेत किंवा योग्य तो मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती. तसेच १८५७ पासून आतापर्यंत लाल किल्ल्यावर ठेवलेल्या अवैध कब्जा प्रकरणीही योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणीही, या याचिकेमधून करण्यात आला होती. 

टॅग्स :Red Fortलाल किल्लाCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय