शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 09:47 IST

Delhi Violence News: दिल्ली हिंसाचार सुनावणीवेळी हायकोर्टाने दिल्लीत पुन्हा १९८४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नका असं सांगत दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते.

ठळक मुद्देराष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी दिल्ली हायकोर्टात हिंसाचार प्रकरणावर सुरु होती सुनावणी पोलिसांना फटकारल्यानंतर न्यायाधीशांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात बदली

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजधानी दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचारावर हायकोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरु आहे. सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात केली आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेसाठी खंडपीठाकडे सोपवण्यात आली. 

राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती. 

दिल्ली हिंसाचार सुनावणीवेळी हायकोर्टाने दिल्लीत पुन्हा १९८४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नका असं सांगत दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आम्ही आताही १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या नुकसान भरपाईची प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. अशाप्रकारे पुन्हा होऊ देऊ नका असं सांगितले. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले होते. 

तसेच एवढी गंभीर प्रक्षोभक भाषणे जाहीरपणे केली जाऊनही गुन्हे नोंदविले न जाण्यावर न्यायालयाने व्यक्त केलेली तीव्र नाराजी, न्यायालयात आलेल्या विशेष पोलीस आयुक्त प्रवीण रंजन यांनी आयुक्तांना कळवावी, असेही खंडपीठाने सांगितले. हा आदेश देताना न्या. एस. मुरलीधर व न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, कायद्याहून कोणीही श्रेष्ठ नाही. गुन्हे न नोंदविण्याचे काय परिणाम होतील, याचा आयुक्तांनी गांभीर्याने विचार करावा व ललिता कुमारी प्रकरणात ठरवून दिलेल्या मार्गदर्शिकेचे पालन करावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावावेच लागेल. काहीही झाले, तरी दिल्लीत १९८४ची पुनरावृत्ती होऊ दिली जात नाही, असेही खंडपीठाने बजावले. पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहून गुरुवारी पुढील सुनावणी होईल. ही वक्तव्ये करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, म्हणूनच पोलीस काही करत नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी केला होता.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपा