शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:20 IST

Delhi Violence News: दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली.

ठळक मुद्देगेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा देशाचे गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते आणि ते काय करत होते ?दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नसताना अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती का करण्यात आली नाही?

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून आता राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी दिल्लीत उदभवलेल्या परिस्थितीबाबत केंद्र आणि राज्य सरकारवर पाच सवाल डागले आहेत. सोनिया गांधी यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारला विचारलेले प्रश्न१ - गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा देशाचे गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?२ - गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते आणि ते काय करत होते ?३ - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर गुप्तचर संस्थांकडून काय माहिती दिली गेली होती ४ - रविवारी रात्री हिंसाचार सुरू झालेल्या भागात किती प्रमाणात पोलिसांची तैनाती झाली होती. दंगे पसरणार हे माहिती असताना ते रोखण्यासाठी त्याबाबत काय हालचाही झाल्या  ५ - दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नसताना अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती का करण्यात आली नाही?

 दरम्यान, दिल्लीत उसळलेल्या दंगळीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीdelhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाAAPआप