शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 04:18 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : दोषींची गय केली जाणार नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून तीनशे लोक आले आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचारावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत केला.

चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्र्यांवर आरोप करीत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तीन दिवस दिल्ली जळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. गृहमंत्री काय करीत होते? पंतप्रधान अजूनही काही बोलत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाच का पाठविण्यात आले? हिंसाचारग्रस्तांचे अश्रू पुसण्याची गृहमंत्र्यांची जबाबदारी नव्हती का? दिल्लीतील हिंसाचार हा लाजिरवाणा कलंक असून, याला गृहमंत्रालय सर्वस्वी जबाबदार आहे.

चौधरी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.७०० एफआयआर दाखल चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांंनी सांगितले की, दिल्लीतील हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. जगापुढे खरे आले पाहिजे. दिल्ली पोलिसांना शब्बासकी देत त्यांनी दिल्ली पोलिसांवरील आरोप फेटाळले. माझ्या सूचनेनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोबाल यांना पाठविण्यात आले होते. पूर्ण घटनाक्रम सांगत त्यांनी दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केव्हा काय-काय प्रयत्न करण्यात आले, याची तपशीलवार माहिती दिली. आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल करण्यात आले असून, २,६४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा अटक करण्यात आलेली आहे. एक गौप्यस्फोट करताना गृहमंत्री म्हणाले की, लोकांकडून मिळालेले व्हिडिओ तपासले जात आहेत.गृहमंत्र्यांनी सत्य नाही सांगितले - अधीर रंजनगृहमंत्र्यांचे निवेदन संपत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणारे निवेदन केले. सत्य सांगितले नाही. आमच्या चुकीमुळे घडले, यापुढे असे होऊ देणार नाही, असे त्यांना म्हणता आले असते. दिशाभूल करणारे निवेदन ऐकायचे नसल्याने आम्ही सभात्याग केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेस