शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 23:39 IST

दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्य नावाणे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मंजुरीही दिली आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या नावाने महाविदयालय-सेंटर्स असणार आहेत. (Delhi university clears proposal to name new college after savarkar vc justifies the move)दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

या नेत्यांच्या नावानेही असतील महाविद्यालय-सेंटर्स -शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत ज्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यांत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री ब्रह्म प्रकाश आदी नावांचाही समावेश आहे.दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी. सी. जोशी यांनी एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, की ज्या नावांना मंजुरी मिळाली आहे, ती नावे समाजातील त्यांच्या योगदानाच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच, विहित प्रक्रियेचे पालन करूनच, परिषदेने या नावांना मंजुरी दिली आहे.

दिल्लीत दोन नवी महाविद्यालये -दिल्लीत दोन नवी महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. पहिले महाविद्यालय दक्षिण दिल्लीतील भाटी गावात, तर दुसरे महाविद्यालय दिल्लीतील नजफगड गावाजवळील रौशनपुरा येथे उभारण्यात येईल. या दोन महाविद्यालयांशिवाय चार सुविधा केंद्रांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या चार सुविधा केंद्रांपैकी दोन, या दोन्ही महाविद्यालयांच्या परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित दोन शाहबाद डेअरी आणि पूर्व दिल्ली क्षेत्रात सुरू केली जाणार आहेत. तसेच येथे एक नवीन लॉ कॅम्पसही सुरू करण्याचा विचार आहे.

सावरकर स्वातंत्र्य सेनानी होते -प्रो. पी. सी. जोशी यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत, सावरकर हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथे आजही सेल्यूलर जेल आहे, जेथे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. अंदमान येथे गेलो असता, त्या सेल्यूलर जेलला भेट दिली होती. तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे जाणवले, असे प्रो. जोशी यांनी नमूद केले. तसेच, या स्वातंत्र्यसंग्रामात सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचेही योगदान तितकेच मोठे आणि महत्त्वाचे आहे, असेही प्रो. जोशी यांनी म्हटले आहे. ही नावे एक्झिक्यूटिव्ह काउंसीलसमोर अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठातील अनेकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या एक्झिक्यूटिव्ह काउंसिलचे माजी सदस्य राजेश झा यांनी म्हटले आहे, की विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक परिषदेला अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही याला विरोध करू.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरdelhiदिल्लीBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSushma Swarajसुषमा स्वराजArun Jaitleyअरूण जेटली