शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ही कसली शाळा?... वेळेत फी भरली नाही म्हणून ५९ चिमुरड्यांना कोंडलं, ४० डीग्री तापमानात लाही-लाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 11:46 IST

चिमुरड्यांना पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार

नवी दिल्ली : दिल्लीच्या बल्लीमारान परिसरात असलेल्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून तब्बल ५९ चिमुरड्यांना पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे  ४० डिग्री तापमानात काहीही खाण्यास न देता मुलींना उपाशी कोंडून ठेवण्यात आले होते. शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी मुलींचे पालक शाळेत पोहोचले असता त्यांना हा प्रकार समजला.

शाळेतील खोलीत कोंडून ठेवलेल्या मुली पालकांना पाहून जोरजोरात रडू लागल्या. तसेच आपल्या मुलींची अशी अवस्था पाहिल्यावर पालकांना जबरदस्त धक्काच बसला. मुलींच्या पालकांनी याबाबत राबिया स्कूल प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. फी साठी मुलांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या शाळेवर  कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलींच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

शाळेने ५९ विद्यार्थिनींना शाळेच्या तळघरात बंद करून ठेवलं होतं. तसेच ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते तिथे एक साधा पंखाही नव्हता. मुलींच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता. तसेच खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. अनेक पालकांनी पोलिसांना जून महिन्याची फी भरल्याच्या पावत्या दाखवल्या. ४० डिग्री तापमानात पाच तास मुलींना उपाशी ठेवल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका फरहा डीबा खान यांना विचारलं असता त्यांनी पालकांनाच दमदाटी करत मुलींना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिल्लीसह देशभरात शाळेच्या या कृत्याबाबत संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीSchoolशाळाStudentविद्यार्थी