शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"आतिशी यांचा राजीनामा केजरीवाल का मागत नाहीत?"; काँग्रेसचा AAP ला रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:50 IST

काँग्रेसने अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दिल्लीच्या राजकारणात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजधानीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. काँग्रेसनेअरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी त्यांच्या न्याय यात्रेत या मुद्द्यावरून केजरीवाल आणि भाजपा या दोघांवर टीकास्त्र सोडलं आहे. निर्भया घटनेवेळी शीला दीक्षित यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे केजरीवाल बलात्कार आणि लैंगिक छळाच्या ४-५ घटना घडूनही मुख्यमंत्री आतिशी यांच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र यादव म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि भाजपा दोघेही दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीतून सुटू शकत नाहीत. हे दोन्ही पक्ष परस्पर राजकीय वादात अडकून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित न होणे आणि बसेसमधील पॅनिक बटणे अयशस्वी होणे यासारख्या दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या अपयशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

या चर्चेदरम्यान देवेंद्र यादव यांनी भाजपाच्या 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' घोषणेच्या अपयशाकडे लक्ष वेधलं आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. दिल्लीच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना त्यांनी ही सरकारची निष्क्रियता असल्याचं म्हटलं. गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी