शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 10:31 IST

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे.हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे.दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला होता.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (13 ऑक्टोबर) दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला होता. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदुषणात आणखी वाढ झाली आहे. 

दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. सध्या हरियाणातील अलिपूर खालसा (351) आणि पानिपत (339) येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. हरियाणातील कर्नाल येथे पराली जाळल्यानंतर धूर दिल्लीत येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. 

सफर या प्रदूषण संसोधन संस्थेने परालीमुळे 15 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील प्रदूषणात सहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी कॅनॉट प्लेस परिसरात दिल्लीकरांना मास्क वाटले. 

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैमानिक व्ही. के सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून परतल्यामुळे वारे शांत आहेत. मात्र वाऱ्याची दिशा पश्चिम ते उत्तर पश्चिम अशी आहे. त्यामुळे पश्चिम आणि उत्तर पश्चिमेकडील प्रदूषित हवा पंजाब, हरियाणातून दिल्ली-एनसीआरकडे वाहत आहे. हरियाणातील पराली जाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पंजाबमध्ये पराली मोठ्या प्रमाणात जाळल्या जातात. 11 ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढले आहे अशी माहिती राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळातील आकडेवारीवरून मिळाली आहे. 

पंजाब, हरियाणामध्ये पराली जाळण्यावर बंदी असतानाही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पराली जाळतात. सरकारकडून आधुनिक पद्धतीने पराली जाळण्यासाठी 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. दिल्ली-एनसीआरमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब