शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीच लागतील: दिल्ली उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 06:28 IST

सहा आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क     

नवी दिल्ली : राजकीय नेत्यांनी दिलेली आश्वासने अमलात आणायची असतात, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीउच्च न्यायालयाने घेतली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना दिलेले आश्वासन अमलात आणायचे आहे व त्याबद्दल आम आदमी पक्षाच्या सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले. 

कोविड-१९ महामारीत गरीब भाडेकरू जर भाडे भरण्यास असमर्थ असेल तर ते भाडे सरकार देईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी याचिका रोजंदारीवर काम करणारे आणि कामगारांनी केली होती. त्यावर हा निवाडा न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह म्हणाल्या की, “व्यापक जनहित नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानुसार त्याचे लाभार्थी कोण असतील याबाबत सहा आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि त्यानंतर ‘आप’ सरकारने त्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित करावे.”

त्या आश्वासनाकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष का केले?

एकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर ते आश्वासन अमलात आणायचे की नाही याबद्दल भूमिका घेणे हे दिल्ली सरकारचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले. केजरीवाल यांनी दिलेले आश्वासन हे जबर फटका बसलेले घरमालक आणि भाडेकरूंसाठी दिलासा देणारे मलम होते, असे सांगून न्यायालयाने म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष का केले आणि ते अमलात आणले जाऊ शकत नाही, असा विचार का केला हे स्पष्ट होत नाही. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल