शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हत्याकांडाने दिल्ली हादरली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:04 IST

राजधानी दिल्लीत एकाच घरात पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. उत्तरपूर्व दिल्लीमधील मानसरोवर पार्क येथे हा हत्याकांड झाला आहे.

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत एकाच घरातील पाच जणांची हत्या हत्या झालेल्यांमधील चौघेजण एकाच कुटुंबातील आहेत, तर एका सुरक्षारक्षकाचा समावेश तपासासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एकाच घरातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. उत्तरपूर्व दिल्लीमधील मानसरोवर पार्क येथे हा हत्याकांड झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याने राजधानी हादरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु आहे. 

हत्या झालेल्यांमधील चौघेजण एकाच कुटुंबातील आहेत, तर एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. सर्व मृतदेहांची ओळखदेखील पटली आहे. नुपूर जिंदाल (35), अंजली जिंदाल (33), उर्मिला (65) आणि संगीत गुप्ता (43) हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून याशिवाय सुरक्षारक्षक राकेश (50) यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना सकाळी 7.30 वाजता फोनवरुन हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हत्या करण्यात आलेल्या कुटुंबाचा त्याच परिसरात तेलाचा व्यवसाय आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. सहपोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला असून तपासासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

पोलिसांनी इतर नातेवाईकांची चौकशी सुरु केली असून, हत्येमागे नेमकं कोणतं कारण होतं याचा शोध घेत आहेत. दरम्यान संपत्तीच्या वादावरुन हा हत्याकांड झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून, फिंगरप्रिंट घेतले आहेत. हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. लवकराच लवकरत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.  

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली