शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! "या" विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 13:32 IST

Delhi Skill and Entrepreneurship University : विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांना नोकरीची चिंता सतावत असते. विद्यार्थ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. Delhi Skill and Entrepreneurship University असं या विद्यापीठाचं नाव असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. 

केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिनियमानुसार या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.  "विद्यापीठाविषयी माहिती देताना खूप आनंद होत आहे. विद्यापीठाची पहिली बैठक पार पडली आहे. यामध्ये कुलपती आणि बोर्डाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता" अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला रोजगार मिळवून देणं हाच उद्देश आहे. तसंच नवीन व्यापार करण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा देखील यामागील उद्देश आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश

सरकारने यासाठी आयआयएम-अहमदाबादमधील सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड इंटररप्रेन्योरशिपच्या प्रमुख डॉ. निहारिका वोहरा यांची कुलपती म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक डीन प्रमथ राज सिन्हा, जॅनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन, नोकरी डॉटकॉमचे संस्थापक संजीव बिखचंदानी, उद्योजक श्रीकांत शास्त्री आणि आयपी विद्यापीठाचे संस्थापक के. के. अग्रवाल यांचा समावेश आहे.

"प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश"

आम्ही विद्यापीठाचे कुलपती आणि बोर्डाच्या अन्य सदस्यांची नियुक्ती केली आहे. या विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश आहे. मी सर्वांशी याबाबत योग्य ती चर्चा केली आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच या विद्यापीठामध्ये गुणवत्ता आणि योग्य शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांशी करारदेखील करण्यात येणार आहेत  अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठEducationशिक्षणjobनोकरीStudentविद्यार्थीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल