शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

Delhi Elections 2024: दिल्लीत आपचा दारूण पराभव, काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:26 IST

Delhi Election Result 2025: २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपच्या पराभवावर काँग्रेस नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. 

AAP-Congress Delhi Election 2025: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत अरविंद केजरीवालांनी स्वबळाचा नारा दिला. तेव्हापासूनच काँग्रेस बदल्याच्या भावनेने कामाला लागल्याचे दिसले. राहुल गांधींपासून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी केजरीवालांना लक्ष्य केले. निवडणुकीचे निकाल लागले. काँग्रेसला या निवडणुकीतही अपयश आले, पण नेत्यांच्या निकालाबद्दलच्या प्रतिक्रिया उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगणाऱ्या आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'२०१३ मध्ये आम आदमी पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा त्यावेळचा निर्णय हे काँग्रेसच्या पि‍छेहाटीचं सर्वात मोठं कारण होतं', असे काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणालेले. त्यानंतर काँग्रेसनेच आम आदमी पक्षाला भ्रष्टाचार आणि असुविधांच्या मुद्द्यांवरून घेरलं. इंडिया आघाडीत फूट पडल्याचा मेसेजही यातून स्पष्टपणे गेला. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधीपासूनच काँग्रेसच्या दिल्लीतील ऱ्हासासाठी नेते आम आदमी पक्षाला जबाबदार ठरवू लागले होते. त्यामुळे प्रचारात भाजप विरुद्ध आप असे चित्र होतेच, त्याचबरोबर आप विरुद्ध काँग्रेस असा संघर्षही दिसला होता. 

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसला दिल्लीत आपचे सरकार नको होते, अशी भूमिका आता काँग्रेसकडून मांडली जाताना दिसत आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सत्तांतर होणं अपेक्षित होतं, अशीच भूमिका मांडली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल काँग्रेसचे नेते काय बोलले?

काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना म्हणाल्या की, "दिल्लीतील लोकांना बदल हवा होता. त्यांनी बदलासाठी मतदान केलं. लोकांसोबतच्या बैठकीतून हे दिसत होतं", असे म्हणत त्यांनी आपचा पराभव अपेक्षित होत असेच प्रत्यक्षपणे अधोरेखित केले. 

इतकंच नाही, तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही अशाच आशयाची भूमिका मांडली. "आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबादारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत. आम्ही राजकीय पक्ष आहोत."

अलका लांबा म्हणाल्या की, "ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले आहे, दिल्ली त्यांचे नुकसान केले आहे." 

काँग्रेस-आप वैर वाढणार?

आप आदमी पक्षाची दिल्लीतील सरकार गेलं. त्यानंतर काँग्रेस आणि आपमधील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमुळे आपला फटका बसला, तर त्याचा फायदा थेट भाजपला झाल्याचे आकेडवारीतून दिसत आहे. 

हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल काँग्रेसविरोधात जाहीरपणे बोलू लागले होते. आता केजरीवालांनाच सत्तेतून पायउतार व्हावं लागल्याने दोन्ही पक्षातील वैर वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपcongressकाँग्रेस