शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:55 IST

गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले

नवी दिल्ली - निवडणुकीच्या आखाड्यातील चाणक्य म्हणून प्रतिमा निर्माण करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा ७० पैकी ४५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपाच्या बाजूने वारे वाहतंय असं सांगितलं. मात्र तरीही भाजपा नेत्यांचे चेहरे उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे मोदी-शहा यांनी केलेल्या दाव्यामुळे जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा संधी देणार नाही असं भाजपातील नेत्यांना वाटत आहे. 

रॅलीमधून राजकीय हवा बदलण्याची अपेक्षास्वत: मोदी-शहा तसेच पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी, पक्षाचा अंतर्गत कथित सर्व्हे यातून जनतेचा बदलेला मुड आणि काही ओपनियन पोलचे निकाल त्यामुळे भाजपाला आशेचे किरण दिसत आहेत. भाजपा नेत्यांचा असा विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांनंतर वातावरण भाजपाच्या बाजूने दिसायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पूर्व दिल्लीत घेतलेल्या सभेनंतर दिल्लीतील सर्व विधानसभा मतदार संघात पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. मोदींनी शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राइक, बाटला हाऊस या विषयांवर आपली मतं उघडपणे व्यक्त केली, त्याचा लोकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे असा दावा या सर्वेक्षणातील आकड्यांच्या आधारे केला जात आहे. 

अंतर्गत सर्वेक्षणामुळे भाजपाचा उत्साह वाढलाभाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या मेळाव्यापूर्वी झालेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये, दिल्लीत आम आदमी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देताना दिसत होता. परंतु निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने झुकताना दिसले. मात्र, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर भाजपा आणि आपमध्ये कडवी झुंज होताना दिसत आहे. यात निकाल आता भाजपाच्या बाजूने झुकताना दिसतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात कॉंग्रेस बर्‍याच जागांवर विजयी होताना दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपा २७ जागा मिळताना दिसत होत्या, तर आपला २६, काँग्रेसला ८ ते ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला. पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व्हेनुसार आप आणि भाजपात कडवी लढत आहे. निकाल कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो, मात्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली पश्चिम, द्वारका याठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमुळे वातावरण भाजपासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिमी दिल्लीच्या ग्रामीण भागात भाजपाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. 

मेळाव्यात जमलेल्या गर्दीमुळे अपेक्षा वाढल्या. शहा यांनी सभेच्यावेळी जमलेल्या गर्दीचे अनेक फोटो ट्विट केले. मडीपूर आणि सीमापुरी विधानसभा मतदारसंघातील रोड शोचे फोटो शेअर करताना ते म्हणाले की, रोड शोला जमलेल्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या संख्येने दिल्लीत भाजपा किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो.

जेव्हा मी दिल्लीतील लोकांशी संपर्क साधला, तेव्हा असे स्पष्ट झाले की ते खोटी आश्वासने, विभाजनाचे राजकारण आणि अराजकतेमुळे लोक त्रस्त आहेत. त्यांना आता विकास हवा आहे. दिल्लीत भाजपला मिळत असलेला पाठिंबा पाहता हे स्पष्ट झाले आहे की 11 फेब्रुवारी रोजी भाजपा 45 हून अधिक जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे असंही अमित शहा म्हणाले.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप