शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

दिल्लीत ४५ जागा जिंकून भाजपा सरकार बनवणार; अमित शहांच्या दाव्यामागे 'हे' आहे लॉजिक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:55 IST

गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले

नवी दिल्ली - निवडणुकीच्या आखाड्यातील चाणक्य म्हणून प्रतिमा निर्माण करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा ७० पैकी ४५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपाच्या बाजूने वारे वाहतंय असं सांगितलं. मात्र तरीही भाजपा नेत्यांचे चेहरे उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे मोदी-शहा यांनी केलेल्या दाव्यामुळे जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा संधी देणार नाही असं भाजपातील नेत्यांना वाटत आहे. 

रॅलीमधून राजकीय हवा बदलण्याची अपेक्षास्वत: मोदी-शहा तसेच पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी, पक्षाचा अंतर्गत कथित सर्व्हे यातून जनतेचा बदलेला मुड आणि काही ओपनियन पोलचे निकाल त्यामुळे भाजपाला आशेचे किरण दिसत आहेत. भाजपा नेत्यांचा असा विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मेळाव्यांनी दिल्लीत निवडणुकीचे वातावरण बदलण्याचे काम केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांनंतर वातावरण भाजपाच्या बाजूने दिसायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पूर्व दिल्लीत घेतलेल्या सभेनंतर दिल्लीतील सर्व विधानसभा मतदार संघात पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. मोदींनी शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राइक, बाटला हाऊस या विषयांवर आपली मतं उघडपणे व्यक्त केली, त्याचा लोकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे असा दावा या सर्वेक्षणातील आकड्यांच्या आधारे केला जात आहे. 

अंतर्गत सर्वेक्षणामुळे भाजपाचा उत्साह वाढलाभाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या मेळाव्यापूर्वी झालेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये, दिल्लीत आम आदमी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देताना दिसत होता. परंतु निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने झुकताना दिसले. मात्र, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर भाजपा आणि आपमध्ये कडवी झुंज होताना दिसत आहे. यात निकाल आता भाजपाच्या बाजूने झुकताना दिसतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्वेक्षणात कॉंग्रेस बर्‍याच जागांवर विजयी होताना दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरा केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपा २७ जागा मिळताना दिसत होत्या, तर आपला २६, काँग्रेसला ८ ते ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला. पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व्हेनुसार आप आणि भाजपात कडवी लढत आहे. निकाल कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो, मात्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली पश्चिम, द्वारका याठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमुळे वातावरण भाजपासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिमी दिल्लीच्या ग्रामीण भागात भाजपाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. 

मेळाव्यात जमलेल्या गर्दीमुळे अपेक्षा वाढल्या. शहा यांनी सभेच्यावेळी जमलेल्या गर्दीचे अनेक फोटो ट्विट केले. मडीपूर आणि सीमापुरी विधानसभा मतदारसंघातील रोड शोचे फोटो शेअर करताना ते म्हणाले की, रोड शोला जमलेल्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या संख्येने दिल्लीत भाजपा किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो.

जेव्हा मी दिल्लीतील लोकांशी संपर्क साधला, तेव्हा असे स्पष्ट झाले की ते खोटी आश्वासने, विभाजनाचे राजकारण आणि अराजकतेमुळे लोक त्रस्त आहेत. त्यांना आता विकास हवा आहे. दिल्लीत भाजपला मिळत असलेला पाठिंबा पाहता हे स्पष्ट झाले आहे की 11 फेब्रुवारी रोजी भाजपा 45 हून अधिक जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे असंही अमित शहा म्हणाले.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप