शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:46 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता.

ठळक मुद्देसीएएची मागणी अकाली दलानेच केली होती.पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेनंतर भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने साथ सोडली असून २१ वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने(शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर भाजपाने दबाव टाकला होता. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सीएएवर भूमिका घेतल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमी भाजपासोबत निवडणूक लढवितो. जर आम्ही आवाज उठवू शकत नाही तर निवडणूक लढविण्यात काही अर्थ नाही. 

कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचेही सिरसा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय नाही तर सामाजिक युती आहे. पंजाबमध्ये शांती आणि भाऊबंध टिकविणारे ही युती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. 

Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारीदिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर 

सीएएची मागणी अकाली दलानेच केली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या एका धर्माला काढण्याचे कधीच म्हटले नव्हते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये मुस्लिमांनाही सहभागी करण्यात यायला हवे, असेही सिरसा म्हणाले. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलArvind Kejriwalअरविंद केजरीवाल