शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:46 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता.

ठळक मुद्देसीएएची मागणी अकाली दलानेच केली होती.पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेनंतर भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने साथ सोडली असून २१ वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने(शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर भाजपाने दबाव टाकला होता. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सीएएवर भूमिका घेतल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमी भाजपासोबत निवडणूक लढवितो. जर आम्ही आवाज उठवू शकत नाही तर निवडणूक लढविण्यात काही अर्थ नाही. 

कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचेही सिरसा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय नाही तर सामाजिक युती आहे. पंजाबमध्ये शांती आणि भाऊबंध टिकविणारे ही युती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. 

Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारीदिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर 

सीएएची मागणी अकाली दलानेच केली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या एका धर्माला काढण्याचे कधीच म्हटले नव्हते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये मुस्लिमांनाही सहभागी करण्यात यायला हवे, असेही सिरसा म्हणाले. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलArvind Kejriwalअरविंद केजरीवाल