शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

" 'आप'ला जिंकवण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही काही…’’ दिल्लीच्या निकालांनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:33 IST

Delhi Election 2025 Results Live Update: काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना दिल्लीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण ही काही आमची जबाबदारी नाही, असं विधान केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. तसेच त्यामध्ये ४८ जागांवर आघाडी घेत भाजपाने विजय निश्चित केला आहे. तर मागच्या १० वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाची  २२ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. दिल्लीतील निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर इंडिया आघाडीमधील नेते आणि काँग्रेसकडून आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना दिल्लीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण ही काही आमची जबाबदारी नाही, असं विधान केलं आहे.

काँग्रेस आपच्या सोबत असती तर असा निकाल लागला नसता, असं  आप आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून वारंवार सांगण्यात येतंय, असं विचारलं असता सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत, आम्हीही राजकीय पक्ष आहोत, असे श्रीनेत यांनी सांगितले. 

त्या पुढे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये आमचं राजकीय अस्तित्व आहे आणि आपण स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे, अशा विचार आम्ही केला होता. आता कोण काय म्हणतं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मला वाटतं की आम्ही चांगला प्रचार केला. आम आदमी पक्ष हा त्यांच्या अपयशामुळे पराभूत झाला आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही. २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ८आमदार निवडून आले होते. मात्र २०१५ आणि २०२० साली झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने जोरदार प्रचार मोहीम राबवल्याने काँग्रेसला काही जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळीही काँग्रेसचं खातं उघडू शकलं नाही. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी