शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अरविंद केजरीवाल आणि अतिशी पराभूत होणार; अमित शाहांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 21:04 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह मैदानात उतरले आहेत.

Delhi Election 2025 : दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. ते दिल्लीतील विविध मतदारसंघात सभा घेत असून, सत्ताधारी आपसह काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, दोघेही आपल्या मतदारसंघात पराभूत होणार असल्याचा दावा अमित शाहांनी आज केला आहे. 

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 नंतर देशात पहिली गरीब कल्याण योजना आणली. उपचार योजना असो, मोफत घर असो, शौचालय असो, रेशन असो, गॅस सिलिंडर असो. हे सर्व भाजपने आणले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केजरीवालांनी फुकटच्या योजना आणल्या. भाजपने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि गरीब कल्याणकारी योजना राबवल्या. 

दिल्लीत भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, अरविंद केजरीवाल स्वत: नवी दिल्लीतून हरणार आहेत. आतिशीही त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहेत. सध्या आमचा अजेंडा जिंकण्याचा आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हा निर्णय नंतर घेतला जाईळ. सर्व 70 लोकांना आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असे वाटते. कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे शाह यावेळी म्हणाले.

यमुनेच्या मुद्द्यावर दिले उत्तर भाजपचा दिल्लीतील राजकीय वनवास संपणार आहे का? यावर शाह म्हणाले की, खोटे बोलणे फार काळ टिकत नाही. केजरीवाल सरकारची 10 वर्षे झाली. आता हे खोटे उघड झाले आहे. त्यांनी ज्या प्रकारे दिल्लीत अशांतता निर्माण केली आहे, सर्वत्र अराजकता पसरवली, जनता हे सर्व पाहत आहे. भाजपचे हरियाणा सरकार यमुनेमध्ये विष मिसळत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. यावर अमित शाह म्हणाले की, विष मिसळले, त्याच्या चाचणीचा अहवाल कुठे आहे? त्यांना खोटे बोलून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते जनतेला घाबरवून आणि दहशत पसरवून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हरियाणा सरकारदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक