शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

"मित्रांचे १५ लाख कोटी माफ केले, आता PM मोदी म्हणतात काहीच फ्री मिळणार नाही", मनिष सिसोदिया बरसले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 3:58 PM

दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली-

दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या मित्रांचे १५ लाख कोटी माफ केल्यानंतर पंतप्रधान मोदी आता काहीच मोफत मिळणार नाही असं म्हणत आहेत, अशी टीका सिसोदिया यांनी यावेळी केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीच्या कारणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था झाल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला. 

"आपल्या मित्रांवरील १० लाख कोटी रुपयांचं कर्ज आणि ५ लाख कोटी रुपयांचा टॅक्स माफ करुन पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला इतक्या वाइट स्थितीत का ढकललं? असा माझा पंतप्रधानांना प्रश्न आहे. इथल्या-तिथल्या चर्चा करू नका, मुद्द्यावर बोला. गेल्या ७५ वर्षात असं कधीच झालेलं नाही", असं मनिष सिसोदिया म्हणाले. 

मनिष सिसोदिया यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-- देशात आज चक्क पीठ आणि तांदुळावरही कर लावला जात आहे. - गरीब व्यक्तीला आपल्या मुलांना दूध-दही विकत घेऊन द्यायचं असेल तर त्यालाही कर भरावा लागत आहे. - देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकार आता म्हणतंय की आमच्याकडे पैसे नाहीत. - सरकारी शाळा सरकार उभारू शकलं नाही, सरकारी रुग्णालयं उभारू शकलं नाही, वृद्धांना पेन्शन दिली नाही, गरीबांसाठी चांगल्या योजना सरकार देऊ शकलं नाही. देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.- देशातील जनतेनं कराच्या रुपात दिलेल्या पैशानं मोदीजींच्या मित्रांची तिजोरी भरण्याचं काम झालं आहे. - देशातील करदात्या जनतेनं सरकारकडे यासाठी कर जमा केला आहे की त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण, शाळा आणि आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. - पण सरकार आता म्हणतंय की जनतेला कोणतीच गोष्ट मोफत मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतील. मग ते लहान मुलांना रुग्णालयात दाखल करणं असो किंवा मग शाळेत प्रवेश देणं असो. सर्वांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

टॅग्स :AAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी