शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"91 टक्के लोक म्हणतात भाजपा गुंडगिरी, हिंसाचार घडवून आणते"; मनीष सिसोदियांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:08 IST

Manish Sisodia And BJP : सिसोदिया म्हणाले की, 21 एप्रिलपासून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ज्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण करण्यासाठी दोन आठवडे लागले.

नवी दिल्ली - दिल्लीत भाजपा आणि आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. याच दरम्यान, एका सर्वेक्षणाचा हवाला देत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही लोकांचे सर्वेक्षण करून कोणता पक्ष गुंडागर्दी आणि दंगली करतो, असे विचारले होते, त्यात 91% लोकांनी भाजपा गुंडगिरी आणि हिंसाचार घडवून आणते असं सांगितलं.

सिसोदिया म्हणाले की, 21 एप्रिलपासून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ज्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण करण्यासाठी दोन आठवडे लागले. आयव्हीआर कॉल, फील्ड वर्क आणि केटी सर्वेक्षण 3 प्रकारे केले गेले. यामध्ये 11 लाख 54 हजार 231 लोकांशी संवाद साधण्यात आला. हे सर्वेक्षण संपूर्ण दिल्लीत करण्यात आले आहे. सर्वेक्षणात 91 टक्के लोकांनी भाजपा गुंडगिरी आणि हिंसाचार घडवून आणत असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी 8% काँग्रेस आणि 1% इतर असल्याचं सांगितलं.

कोणत्या पक्षात सर्वात जास्त निरक्षर लोक आहेत? उत्तरात 89% लोकांनी भाजपाचे नाव घेतले. 5% लोकांनी काँग्रेसला, 2% लोकांनी AAP आणि 4% लोकांनी इतरांना मतदान केले. ज्या पक्षात शिकलेले लोक आहेत यासाठी 73% लोकांनी AAP ला मतदान केले. 15 टक्के लोकांनी काँग्रेसला, 10 टक्के भाजपाला आणि 2 टक्के लोकांनी इतरांना मते दिली. भाजपावर निशाणा साधत मनीष सिसोदिया म्हणाले की, भाजपा जनतेमध्ये पूर्णपणे उघडे पडल्याचे दिसून येत आहे. ते फक्त गुंडगिरी करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AAPआपBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस